Raju Shetti, Ravikant Tupkar, buldhana, swabhimani shetkari sanghatana saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti यांची कबूली, 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वाद आहेत'; असा काढणार मार्ग सांगितलं शेट्टींनी

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / संजय जाधव

Ravikant Tupkar vs Raju Shetti : बुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांमध्ये वाद आहेत. परंतु ते फार माेठे आहेत असं नाही. लवकरच पेल्यातले वादळ पेल्यातच संपून जाईल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (swabhimani shetkari sanghatana leader raju shetti) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. (Maharashtra News)

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांचा माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सहभागी झाले परंतु त्याच जिल्ह्यातील स्वाभिमानीचा आवाज असणारे रविकांत तुपकर हे सहभागी झाले नाहीत. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाली. त्यात रविकांत तुपकर यांनी बुधवारी स्वाभिमानीची तातडीची बैठक बाेलावली. याच बैठकीत तुपकरांनी फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वाघाची शिकार होत नाही असा शेट्टींना अप्रत्यक्ष टोला लगावला.

याबराेबरच नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, परंतु मी आत्महत्या करणार नाही, असे म्हणत फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही, त्यासाठी खांदा इमानदार आणि खानदानी असावा लागतो असेही रविकांत तुपकर यांनी म्हटलं.

संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली. त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे असेही रविकांत तुपकर यांनी जाहीर केले. रविकांत तुपकरांचे राजू शेट्टी यांच्या विरोधात हे बंडाचे निशाण तर नाही ना अशी चर्चा राज्यभरात सुरु झाली.

दरम्यान या चर्चेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले माध्यमांमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत उलट सुलट बातम्या येत आहेत. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

पेल्यातले वादळ पेल्यातच संपून जाईल

बुलडाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहे, मात्र तो फार मोठा वाद आहे असं नाही. या वादावर चर्चा करण्यासाठी शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर आणि आणि युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर (prashant dikkar) यांना येत्या पाच ते सात दिवसांत सर्वांच्या साेयीने त्यांना बोलावून त्यांचा वाद मिटवण्यात येईल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT