Hatnur dam
Hatnur dam 
महाराष्ट्र

तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

भूषण अहिरे

धुळे : हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात १८ हजार १८७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळ धुळे जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (dhule-news-Warning-to-villages-near-Tapi-river-basin-Appeal-of-Dhule-Collector-jalaj-sharma)

गेल्या काही दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळेच प्रशासनातर्फे धरणाचे बारा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तापी नदीचे दोन्‍ही काठांपर्यंत पाणी पोहचले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्‍यास धरणातील पाणी पातळी वाढण्याची शक्‍यता आहे.

जिल्‍हाधिकारींचे आवाहन

तापी नदी पात्रामध्ये प्रचंड पाण्याची वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT