Hatnur dam 
महाराष्ट्र

तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

तापी नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा; धुळे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

भूषण अहिरे

धुळे : हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात १८ हजार १८७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळ धुळे जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (dhule-news-Warning-to-villages-near-Tapi-river-basin-Appeal-of-Dhule-Collector-jalaj-sharma)

गेल्या काही दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळेच प्रशासनातर्फे धरणाचे बारा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तापी नदीचे दोन्‍ही काठांपर्यंत पाणी पोहचले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्‍यास धरणातील पाणी पातळी वाढण्याची शक्‍यता आहे.

जिल्‍हाधिकारींचे आवाहन

तापी नदी पात्रामध्ये प्रचंड पाण्याची वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार पुण्यावरून बारामतीकडे रवाना

Actor Case: प्रसिद्ध अभिनेत्याला होणार अटक? उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत सरेंडर करण्याचा दिला आदेश

Shocking: आईने पोटच्या ३ मुलांना गळफास दिला, नंतर पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...

मुंबईचा महापौर अन् उपमहापौर कोण होणार? महत्त्वाची अपडेट समोर

Shocking: मुंबईतील २० वर्षांच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या, ४०० फूट खोल दरीत मारली उडी

SCROLL FOR NEXT