Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : पाणीपुरवठा करणारे प्रकल्प २५ टक्केच भरले; प्रकल्प भरण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत ऐकीकडे सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात अद्याप २५ टक्के सुध्दा पाणीसाठा झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प चांगले भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

धाराशिव (Dharashiv News) शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यामध्ये तेरणा व रूईभर येथील प्रकल्पाचाही आधार लागतो. उजनी धरणात सध्या ४५.३३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे धाराशिवला सध्या पाण्याची चिंता नाही. मात्र रुईभर धरण कोरडे असुन तेरणात २१.४८ टक्के पाणीसाठा आहे. तर परंडा येथील सिना कोळेगाव प्रकल्पात मृत साठा आहे. त्यामुळे परंडा शहराला एका दिवसाआड पाणी पुरवठा (Water Supply) केला जात आहे. 

मांजर धरणात अजूनही मृतसाठा 

कळंब शहराला मांजरा प्रकल्पातुन (Manjra Dam) पाणी पुरवठा केला जात असुन धरण मोठे असल्याने पाऊस पाडल्यानंतर देखील यात अजूनही मृत साठा शिल्लक आहे. यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे सर्व प्रकल्प समाधानकारक भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. चांगला पाऊस पडल्यानंतर हे प्रकल्प भरून पुढील दिवसातील पाणी टंचाईची समस्या मिटणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT