बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या पाठीवरुन दिला, कोरोना जनजागृतीचा संदेश!
बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या पाठीवरुन दिला, कोरोना जनजागृतीचा संदेश! विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या पाठीवरुन दिला, कोरोना जनजागृतीचा संदेश!

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बार्शीत बैलपोळ्यानिमित्त Bailpola कोरोनाची जनजागृती Corona Awarness करण्यात आली आहे महाराष्ट्रात बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षापासून या सणावरती कोरोनाचे सावट असल्यामुळे तो अत्यंत साध्यापणाने साजरा करण्यात येत आहे आणि सोबतच कोरोनाचे संकट ओळखुन या सणांमधून हि बळीराजाने कोरोनाची जनजागृती केली आहे. Delivered from the back of the bull, the message of Corona awareness

हे देखील पहा-

बैलपोळा या सणाकडे शेतकऱ्यांची दिवाळी म्हणून बघितलं जातं मात्र, गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या Farmers Festival या सणावरती कोरोनाच सावट आहे. त्याच अनुषंगाने बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम कापसे यांनी कोरोनाची जनजागृती केली आहे. बैलांच्या पाठीवरती "कोरोनाचे नियम पाळा तिसरी लाट टाळा", 'लस घ्या कोरोना टाळा","गो कोरोना गो" असं लिहत कोरोनाविषयी जागरुक रहा आणि कोरोनाला हद्दपार करा असा संदेश देण्यात आला आहे.

यंदा कोरोनामुळे बैलांची मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला आहे. गेल्या 45 वर्षांपासूनची बैलपोळा सणाची परंपरा त्यांनी खंडित होऊ दिलेली नाही. सोन्या आणि शिल्या या बैलांवर केलेली रंगरंगोटी लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी केलेल्या या अनोख्या बैलपोळ्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT