Deepak Kesarkar On Uddhav Thackeray, Barsu Refinery, Barsu Refinery Project
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray, Barsu Refinery, Barsu Refinery Project Saam tv
महाराष्ट्र

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंची कार्यपद्धत... खूद्द शरद पवारांनीच लिहलं आहे, आणखी काय हवं : दीपक केसरकर

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (uddhav thackeray visit to barsu) हे विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी बारसूला जाताहेत. त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि मागण्या सांगितल्या तर विरोधासाठी विरोध होणार नाही असे मत काेल्हापूरचे पालकमंत्री, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. (Breaking Marathi News)

केसरकर म्हणाले उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू येथे व्हावे हे पत्र देवून सुचवलं होतं. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र देऊन पदावरुन गेल्यानंतर स्वतः विरोध करीत आहे. म्हणूनच त्यांच्या (ठाकरेंच्या) कार्यपद्धतीबद्दल शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये व्यवस्थित लिहिले आहे. त्यामुळे त्यावर मी अधिक बोलणे गरजेचं नाही असा चिमटा केसरकरांनी ठाकरेंना काढला.

दरम्यान कोकणात कुठलेही मोठे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण कोकण मुंबई आणि गोवा राज्यावर अवलंबून आहे. या परिसरातील तरुणांना रोजगार हवे आहेत. त्यासाठी कोकणात रिफायनरी प्रकल्प मार्फत अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे यात कोणतेही राजकारण करू नये असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Today's Marathi News Live: निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, ना की धर्म, जातीपातीवर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंनी सुनावलं

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT