CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: राज्यात शांतता नांदूदे..., उत्तेश्वराच्या दर्शनानंतर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

CM Eknath Shinde News: मागासवर्ग आयोग आणि 40 हजार कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. कुणबी नोंदी सापडल्यावर ते प्रमाणपत्र देण्याच कामदेखील सुरू आहे, त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

Sandeep Gawade

CM Eknath Shinde

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कालही तीच भूमिका होती आजही तीच आहे. ओबीसी किवा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी मागासवर्ग आयोग आणि 40 हजार कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. कुणबी नोंदी सापडल्यावर ते प्रमाणपत्र देण्याच कामदेखील सुरू आहे, त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तेश्वर देवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवाकडे राज्यावरचं, बळीराजावरचं संकट दूर होवो. राज्यातील प्रत्येक घटकात चांगले आनंदाचे दिवस येवोत, सर्वत्र शांतता नांदावी असं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं.

जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्याने ज्या चर्चा होतायेत त्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नाही. आरक्षण देण्यावर ठाम आहे. जरांगेना आवाहन केले आहे सरकार जर सकारात्मक नसेल तर आंदोलन ठिक आहे. सरकार सकारात्मक असेल तर त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. सर्व मराठा बांधवांनाही सरकार्य करण्याचं आवाहन करत असल्याचं ते म्हणाले. तसेच डिव्हिजनल अधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगें आंदोलनावर ठाम

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारणारी नोटीस जरांगे यांना पाठवली आहे. आज गुरुवारी मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ ठरली. मात्र, त्यानंतर मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करणार आहे. त्यासाठी त्यांची पदयात्रा जालन्याहून मुंबईकडे निघाली आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत मोठ्या संख्येने लोक पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबई न येण्यासाठी नोटीस पाठवली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT