Chhatrapati SambhajiNagar Politics Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Group: ठाकरे गटात धूसफूस! पहिल्या फळीतील दोन नेत्यांचा वाद मातोश्रीवर सुटणार?

Chhatrapati SambhajiNagar Politics: छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे दोन मोठे नेत्यांमधील वाद विकोपाला गेलाय. दोन्ही नेत्यांचे भांडण थेट मातोश्रीवर गेले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहावं लागले.

Bharat Jadhav

छत्रपती संभाजीनगरमधील नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे तेथील स्थानिक राजकारण तापलंय. आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. दोन्ही नेत्यांचा वाद थेट मातोश्री पोहोचलाय. अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत नंतर प्रवेश केला पण आता ते पक्षात काड्या करत आहेत. पक्षाच्या कार्यक्रमात आपल्याला डावलतात, अशी तक्रार शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंकडे करणार आहेत.

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे मराठावाड्यातील ठाकरे गटाचे दोन मोठे चेहरे आहेत. पण दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे ठाकरे गटातील समन्वयाचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. पक्षाच्या कार्यक्रमाचं दानवे यांनी चंद्रकात खैर यांना आमंत्रण दिलं नव्हतं. त्यावरून चंद्रकांत खैरे हे दानवेंवर कमालीचे नाराज झाले आहेत.

ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मेळाव्याबाबत चंद्रकांत खैरेंची अनुपस्थिती होती. त्यावरून बोलताना खैरे म्हणाले, अंबादास दानवे यांनी आपल्याला कार्यक्रमाची माहिती दिली नव्हती. आमंत्रण नव्हतं, फक्त पत्रिकेत माझे नाव होतं. पण कार्यक्रमात डावलवून चालेल का? असा सवाल करत चंद्रकात खैरे हे अंबादास दानवे यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार आहेत.

काही लोक काड्या करत राहतात खैरेंची टीका

आपण अजून पक्षासाठी काम करतोय, पक्ष वाढवण्याची कामे करतोय. मरून जाऊ पण पक्ष सोडणार नाही. पण दानवे काड्या करतात, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय. पक्ष वाढवण्याचे काम करण्याची सोडून दानवे गटबाजी करत असल्याचा आरोपही खैरे यांनी केलाय. उद्धव ठाकरे संकटात आहेत, एकत्र येऊन काम करावे लागेल, कोणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही.

पण मी मरेल पण पक्ष सोडणार नाही, तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेकजण कुठं- कुठे जातात कोण कसे अॅडजस्ट करतात, ते मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्यानं फोन करतो. पक्ष मोठा करायचं दिलं सोडून आणि गटबाजी करतात. मी अजूनही काम करतो, अनेक लोक सोडून चालले बरं नाही असं म्हणत खैरे यांनी दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलीय.

अंबादास दानवेंनी मेळाव्याबाबत आपल्याला सांगितलं नाही, मी उद्धव साहेबांना सांगणार आहे, त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखा वागतात. पण शिवसेना मी वाढवलीय. ते नंतर आले आणि आता काड्या करण्याचे काम करत आहेत. ते माझ्याशी बोलत नाही, मी माझं आंदोलन करणार ते करतली ना करतील. पक्ष चालवायचा असेल तर एकत्र राहिलं पाहिजे. पण या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले. या माणसाने पक्षासाठी काय केलं सांगा.अनेक लोक सोडून जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT