Weather Alert : महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता Saam Tv
महाराष्ट्र

Weather Alert : महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

राज्यामध्ये पावसाकरिता पोषक हवामान निर्माण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याबरोबरच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये कडाक्याची थंडी (cold maharashtra) पडली होती. यामुळे आता राज्यात किमान तापमानामध्ये थोडासा वाढ झाली आहे. राज्यामध्ये पावसाकरिता पोषक हवामान निर्माण झाले आहे. उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. पुढील ४ दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने (IMD) येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.\

हे देखील पहा-

उद्या धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) या २ जिल्ह्यामध्ये (district) ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. पुढील २४ तासामध्ये या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. ८ जानेवारीनंतर राज्यामध्ये हळुहळू पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून नंदुरबार, धुळे, नाशिक (Nashik), जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर ८ आणि ९ जानेवारीला मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे.

उद्यापासून हवामान विभागाने बुलडाणा, वर्धा, अकोला, नागपूर आणि अमरावती या ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. याबरोबरच ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रविवारी हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. संबंधित जिल्ह्यामध्ये विकेंडला विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाला आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यामध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. ऐन हिवाळ्यामध्ये पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे मागील आठवड्यामध्ये विदर्भासह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यानंतर आता परत एकदा राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे राहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT