केंद्र आणि राज्य सरकार मध्ये सध्या टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी
केंद्र आणि राज्य सरकार मध्ये सध्या टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी Saam Tv
महाराष्ट्र

केंद्र आणि राज्य सरकार मध्ये सध्या टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकार मध्ये सध्या टोळी युद्ध सुरू असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे. त्यांनी आज उस्मानाबाद या ठिकाणी जागर एफ. आर. पी. चा आराधना शक्तिपीठाची ही संकल्पना घेऊन ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

राज्य सरकार केंद्र सरकारच्या मंत्राला अटक करते, तर केंद्र सरकारने राज्यातील एका मोठ्या वजनदार नेत्यांच्या नातेवाइकांच्या घरावर धाडी टाकत टोळी युद्ध सुरू केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे जनतेचा प्रश्न निर्माण झाला की खोटे- खोटे भांडण करुन जनतेची दिशाभूल करत आहेत. राजकीय बदला घेण्यासाठी या इडी, सीबीआय अशा संस्थांचा वापर केला जात आहे. हे सगळं जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. हे सरकर काही करेल अस वाटत नाही.

पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असे हे सरकार सांगत आहे. यामुळे पैसे नसतील, तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी यांनी राज्यसरकारला टोला लगावला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूर येऊन अडीच महिने लोटले आहेत.

मात्र, अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही. ते लोक मदतीसाठी टाहो फोडात आहेत. मुख्यमंत्री फक्त आधार देण्याचे काम करत असून शाब्दिक खेळ केले जात आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेवुन उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली याठिकाणी एफ.आर.पी.चा जागर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माध्यमाशी ते बोलत होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Cooler Precautions | कूलरचा शॉक लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची?

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

Breaking: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मोठी कारवाई! फॉरच्युनरमधून तब्बल 1.14 कोटींची कॅश जप्त

Today's Marathi News Live : नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारी सुरू

Hair Care Tips: 'या' चुका केल्यामुळे होते केस गळती

SCROLL FOR NEXT