ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु होताच केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेतली जाते.
उन्हाळ्याच्या हंगामात केस आणि त्वचा कोरडे आणि निर्जीव होऊ लागते.
उन्हाळ्यात केसांची काळजी नाही घेतली तर केस गळणे, तुटणे या सारख्या समस्या होऊ शकतात.
धुळ, माती, सुर्यप्रकाश आणि प्रदुशनामुळे केस गळण्यास सुरुवात होते आणि ते निर्जीव दिसू लागतात.
उन्हाळ्यात धुळ, मातीमुळे केस चिकट होतात. केस तेलकट झाल्यास लवकर खराब होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात दर दोन दिवसांनी केस धुतल्यास केस निरोगी राहाण्यास मदत होईल.
केस घट्ट नाही तर सैल बांधा त्यामुळे केस गळणे कमी होतील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़