भाजपाची जनआशिर्वाद यात्रा स्थगित  
महाराष्ट्र

भाजपाची जनआशिर्वाद यात्रा स्थगित?

नारायण राणेंना सोडल्याशिवाय यात्रा सुरु होणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर अखेर केंद्रिय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) पोलीसांनी अटक केली आहे. रत्नागिरीच्या (Ratnagiri) संगमेश्वर (Sangmeshwar) येथील गोळवलीकर (Golwalikar) गावात त्यांना अटक करण्यात आली. नारायण राणेंनी न्यायलयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानतंर अखेर राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर याठिकाणी त्यांना अटक करण्यात आली.

हे देखील पहा

मात्र याचे पडसाद आता भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रेवरही उमटल्याचे दिसत आहे. नारायण राणेंना अटक केल्यानंतर भाजपाने जनआशिर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आली आहे. भाजपानेते प्रमोद जठार यांनी याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर राणेंना सोडत नाहीत तोपर्यंत भाजपा शांत बसणार नसल्याचा इशाराही दिला आहे. नारायण राणेंची अटक बेकायदेशीर आहे. त्यांना सोडेपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचेही जठार यांनी म्हटले आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक केल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्य़ात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT