Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News: 'पुढच्या आठ महिन्यात...' चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंबद्दल मोठे विधान; चर्चांना उधाण

Prachee kulkarni

Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूकीविरोधात एकीकडे ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच हे सगळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमुळेच झाले, असा सुर शिंदे गट आणि भाजपाने लावला आहे.

या सगळ्या प्रकरणावर आता भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. साम टीव्हीवर झालेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (ChandraShekhar Bawankule EXclusive)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज साम टिव्हीला एक्सक्लूझिव मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी, पुणे पोटनिवडणूक, पहाटेचा शपथविधी, तसेच शिंदे ठाकरेंच्या सत्तासंघर्षावरही प्रतिक्रिया दिल्या, ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...

"शिवसेनेमध्ये झालेली बंडखोरी ही उद्धव ठाकरेंमुळेच (Udhav Thackeray) झाली असे म्हणत त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांच्या मुलाला मंत्री करायचे होते. म्हणूनच ते राष्ट्रवादी, कॉंग्रेससोबत गेले. तिकडे जाऊनही त्यांनी त्यांच्या आमदारांना, मंत्र्यांना वेळ दिला नाही," असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दरम्यान यावेळी पुणे पोट निवडणूकीत भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच, "ठाकरे गटाच्या भवितव्याबद्दल बोलताना त्यांनी पुढच्या आठ महिन्यात त्यांच्याकडे फक्त चारच लोक राहतील," असेही विधान केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT