Bhaskar Jadhav’s statement triggers protests from Brahmin community in Konkan, fueling caste tensions ahead of Maharashtra’s local elections. Saam Tv
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav: कोकणात ब्राह्मण विरूद्ध मराठा, जाधव म्हणतात, ब्राह्मण पाताळयंत्री

Konkan Politics Heat Up: भास्कर जाधवांच्या विधानानंतर आता कोकणात ब्राह्मण विरुद्ध मराठा वाद पेटण्याची शक्यता आहे. जाधव नेमकं काय म्हणाले? ब्राह्मण महासंघ नेमका का आक्रमक झालाय?

Suprim Maskar

ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी खोतकीसंदर्भात केलेल्या याच भाषणानंतर ब्राम्हण समाज आक्रमक झाला आणि मराठा विरुद्ध ब्राम्हण समाज अशा वादाला सुरुवात झाली.

भास्कर जाधव स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केलाय. तर दुसरीकडे भास्कर जाधवांनी मुंबईतील बैठकीत ब्राम्हण समाजाला डिवचलं आणि वाद टोकाला गेला.

भास्कर जाधव जिल्ह्यात जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार विनय नातूंनी केलाय. भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात संघर्षाची ठिणगी कधी आणि कशी पडली?

जाधव ब्राह्मणांवर का संतापले ?

खोतकीसंदर्भात भास्कर जाधवांचं विधान

ब्राह्मण सहाय्यक संघाचा पक्षीय राजकारणाचा पत्रातून आरोप

असल्या गोष्टींना भीक घालत नसल्याचा जाधवांकडून पत्राद्वारेच टोला

सगळ्यांना एकटा बास, असं स्टेटस ठेवून जाधवांनी ब्राम्हण संघाला डिवचलं

ब्राह्मण समाज जाधवांविरोधात आक्रमक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात मराठा विरूद्ध ब्राह्मण वाद पेटलाय. त्यामुळे भास्कर जाधवांना ब्राम्हण समाजाच्या रोषाचा फटका बसणार की? मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा होणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT