Summer
Summer  Saam Tv
महाराष्ट्र

Summer: औरंगाबादचा पारा आठवडाभरात 43 अंशांपर्यंत जाणार - हवामान विभाग

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: आज कडक उन्हाने औरंगाबादकरांची लाही लाही झाल्याचं चित्र दिसून आलं. आज औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीला पोहोचला आहे. या आठवड्यात औरंगाबाद शहराचा पारा 43 अंशांपर्यंत जाणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे (Aurangabad temperature will rise to 43 degrees in a week says by Meteorological Department).

त्यानुसार, 29, 30 आणि 31 मार्चला औरंगाबाद (Aurangabad) शहरात उष्णतेची लाट राहणार आहे. आठवड्यांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे औरंगाबाद शहरात काहीसा उन्हाचा पारा कमी झाला होता. मात्र, रविवारपासून शहरात पुन्हा उन्हाची (Summer) तीव्रता वाढलीये. हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार, येत्या 29, 30 आणि 31 मार्च या तिन्ही दिवशी शहरात कमाल तापमान तब्बल 43 अंश सेल्सियसवर जाणार आहे.

यंदाच्या मोसमात उष्णतेच्या (Temperature) लाटेचा इशारा हा पहिल्याच वेळेस आला असून मार्चमध्येच (March) उन्हाचे चटके तीव्र झाले. एप्रिल आणि मे महिन्यात शहराचे तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहरामध्ये कमाल तापमानाने पस्तीशी गाठली होती. याच महिन्यात औरंगाबाद शहराचे कमाल तापमानही 40 अंशांच्या पार गेले होते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

SCROLL FOR NEXT