बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मृतदेहाचा छळ केल्याच्या आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदमांनी केला आणि या आरोपांनी राज्यात वादळ उठलं. मात्र या आरोपांना उत्तर देतांना अनिल परबांनी थेट 1993 चं प्रकरण उकरुन काढत रामदास कदमांना घेरलंय.. रामदास कदमांची बायको जळाली की जाळली? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीच अनिल परबांनी केलीय...तर आरोप फेटाळून लावताना परबांना कोर्टात खेचण्याचा इशारा रामदास कदमांनी दिलाय..
एवढंच नाही तर रामदास कदमांनी खुद्द बाळासाहेब ठाकरे जसलोक रुग्णालयात पत्नी ज्योती कदमांना भेटण्यासाठी आल्याचं सांगितलंय.. रामदास कदमांनी 13 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाच्या छळाविषयी केलेलं वक्तव्य असो वा 32 वर्षानंतर परबांकडून रामदास कदमांच्या पत्नीच्या अपघाताविषयी केलेलं वक्तव्य असो.. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापणार हे निश्चित...मात्र सरकार अनिल परबांनी केलेल्या आरोपांची चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.