Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर सरकारला धोका; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला तेव्हाच यांचा भरोसा वाढेल. नाही तर वाढणार नाही. उलट सरकारला धोका भेटणार; असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमीभाव दोन हजार रुपये कमी केले. त्यामुळे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच नुकसान झाल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

अमरावती (Amravati) येथे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राजकारण शेतकऱ्यांच्या भोवती फिरलं पाहिजे. जसं जाती- धर्माभोवती राजकारण फिरत; तसं शेतकऱ्याच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल, तेव्हा शेतकरी शेतमजुरांचे भलं होईल; असेही आमदार कडू (Bachchu Kadu) यांनी सांगितले. 

अनेक आमदार शरद पवार गटात जातील 
अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडून लढू शकतात; अशी एकंदरीत परिस्थिती आहे असा दावा बच्चू कडू यांनी केला. शेवटी आमदाराला मतदार संघात निवडून यायचं असते. पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. निवडून येणं महत्वाचे आहे. लोकांना अजित दादा अशी उडी घेणार हे पटलं नाही. तर भाजप व राष्ट्रवादी यांची विचारधारामध्ये तफावत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT