Amol Kolhe| Ajit Pawar Saamtv
महाराष्ट्र

Amol Kolhe: माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा; अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

Amol Kolhe On Ajit Pawar: राज्यात दोन उपमुख्यमंत्री दोघेही ताकदीचे नेते आहेत. सत्तेसाठी राज्यातले नेते केंद्रात जातात त्याच घाईने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी का जात नाही, असा थेट सवाल कोल्हेंनी केलाय.

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

Maharashtra Political News:

अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे, असं म्हणणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, असं अमोल कोल्हे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून तगडा उमेदवार देऊन तो निवडून आणणार, असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला होता. तसंच अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे.

अमोल कोल्हे राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केल्यानंतर अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात दोन उपमुख्यमंत्री दोघेही ताकदीचे नेते आहेत. सत्तेसाठी राज्यातले नेते केंद्रात जातात त्याच घाईने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी का जात नाही, असा थेट सवाल कोल्हेंनी केलाय. माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपली ताकद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरावी, असा इशारा देखील अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिलाय.

शिवस्वराज्य यात्रेसारखाच शेतकरी आक्रोश मोर्चात उत्साह आहे. मात्र काही नेत्यांची कमी जाणवत आहे, असे भावनिक विधान यावेळी कोल्हेंनी केलेय. शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंसोबत अजित पवार शेवटपर्यंत होते मात्र आज शेतकरी आक्रोश मोर्चातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना अजित पवारांची कमी जाणवत असल्याचे देखील अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

अर्धे मुख्यमंत्री वरुन उपमुख्यमंत्री हे पदच संविधानीक नाही एका पदावर दोन माणसं मग वेगळं काय म्हणणार. त्यांच्या पदाचा,नेतृत्वाचा मान ठेवून कळकळीची मागणी, कांदा खरेदी किती केली त्याला अनुदान दिलं हे स्पष्ट करावं. तेव्हाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली अन आताही तेच, अशी टीका अमोल कोल्हेंनी केलीये.

काय म्हणाले होते अजित पवार?

मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी कोल्हेंसाठी जिवाचं रान केलं. पण मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT