अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सध्या सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे शहरात घाणीचे साम्राज्य पसरत असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरून बसली आहे. पालिकेचा हट्ट आणि ठेकेदाराची हतबलता यात नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहण्यास मिळत असून दुर्गंधी देखील पसरली आहे.
अंबरनाथ पालिकेकडून शहरातला कचरा उचलण्याचं काम समीक्षा कंपनीला ५ वर्षांसाठी देण्यात आले आहे. २०२४ साली या कंपनीला ठेका देताना कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या वापरण्याची अट पालिकेने टेंडरमध्ये टाकली होती. मात्र सध्या इतका कचरा घेऊन डम्पिंगवर फेऱ्या मारू शकेल; इतक्या क्षमतेची इलेक्ट्रिकवर चालणारी गाडीच मार्केटमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळं आहे त्या जुन्या गाड्यांवर ठेकेदार शहरातला कचरा उचलला जात आहे.
सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या घेण्याची तयारी
दरम्यान या गाड्या कचरा उचलण्यासाठी कमी पडत असल्यानं डिझेल किंवा सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या घेण्याची ठेकेदाराची तयारी आहे. मात्र टेंडरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा उल्लेख असल्याने पालिका इलेक्ट्रिक गाड्यांवरच अडून बसली आहे. तर इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या तितक्या सक्षम गाड्या मार्केटमध्ये उपलब्धच नसल्याने ठेकेदार हतबल झाला आहे. इलेक्ट्रिक गाड्या आणायच्या कोठून असा प्रश्न निर्माण होत आहे.
तोडगा न निघाल्याने कचऱ्याचे ढीग
या सगळ्या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहण्यास मिळत आहेत. यावर आता तोडगा काय काढावा? याच्या विवंचनेत ठेकेदार आणि पालिकेचे अधिकारी आहेत. मात्र काहीही असलं, तरी नागरिकांना मात्र याचा त्रास होत असून पालिका आणि ठेकेदाराने एकदाचं काय ते ठरवावं; पण शहर स्वच्छ ठेवावं, इतकीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.