पुणे शहरात गेल्या २ तासांपासून मुसळधार पाऊस
शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पावसाच्या सरी
पुणे शहराला आज रेड अलर्ट
नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, हवामान विभागाचे आवाहन
सिंहगड रस्त्यावर असलेल्या विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः वैतागले
मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडी मध्ये पुणेकरांना सहन करावा लागतोय मोठा मनस्ताप
सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे लोकार्पण न झाल्यामुळे इतर रस्त्यांवर आला वाहतुकीचा ताण
नांदेडच्या मुखेड तालुक्यात बचावकार्य पूर्ण.
चार गावात पुराच्या पाण्यात अडकले होते 293 लोक.
हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढले.
पाच जण वाहून गेले त्यापैकी चार मृतदेह सापडले.
आर्मीच्या जवानांकडून मदत कार्य सुरू.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अजूनही विकास झालेला नाही भामरागड हेमलकसा महामार्गावरील पुलाचे काम चालू आहे मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाही म्हणून आज पुन्हा भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्राचा संपर्क तुटलेला आहे
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग- पर्लकोटा नदी तालुका भामरागड
2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी
3) तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-पोहार नदी तालुका चामोर्शी
3) चौडमपल्ली चपराळा रस्ता तालुका चामोर्शी
4) काढोली ते उराडी रस्ता तालुका कुरखेडा
5) शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता तालुका देसाईगंज
6) कोकडी ते तुलशी रस्ता तालूका देसाईगंज
7) कोपेला झिंगानूर रस्ता स्थानिक नाला तालुका सिरोंचा
8) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता तालुका देसाईगंज
दहिसर पूर्व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टोलनाका जवळील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनचालकांना या ठिकाणी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच केतकीपाडा आणि धरखाडी परिसरातून पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही पाण्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातुन मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
रत्नागिरीतील बहुतांश नद्या इशारा पातळीवर
जगबुडी , शास्री , वाशिष्ठी , काजळी , कोदवली आणि बावनदी इशारा पातळीवर
मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी
चिपळूण , राजापूर, खेडमध्ये सखल भागात पाणी
सातारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच
कोयनानगर -नवजा महामार्गावरील पाबळ येथे नाला खचला
अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, झाड उनमळून पडली
नवजाहा कोयनानगर एसटी वाहतूक ठप्प
रस्ता बंद असल्याने कामरगाव, मिरगाव नवजा. डीचोली मानाईनगर या पाच गावांचा संपर्क तुटला.
पुणे नाशिक,तळेगाव शिक्रापुर मार्गावर वाहतुककोंडी
भरपाऊसात वाहतुककोंडीत प्रवाशांसह कामगारांचे हाल
पाऊसात वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची कसरत सुरु
अवघड वाहनांची बेसिस्त वाहतुकीमुळे वाहतूककोंडी
पुणे जिल्ह्याला प्रशासनाकडून आज ऑरेंज अलर्ट
पुणे शहरातील काही भागात आज सकाळपासून मुसळधार पाऊस
पुणे शहरासह गाठ माथ्यावर देखील कालपासून जोरदार पाऊस
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात
शहरात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे 53 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे तसेच सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच मिस्त्री आणि तांबवे येथील बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. या परिसरात पाऊस वाढल्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत.
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री करणार उड्डाणपुलाचे लोकार्पण
छत्रपती शिवाजीनगर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते आरबीआय या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फ़डणवीस यांच्या हस्ते उद्या संपन्न होणार
या उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता येणार असून वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार
हवामान विभागाने पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज ॲलर्ट जाहीर केल्यानंतर आज पिंपरी चिंचवड सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरण ढगाळ नसला तरी शहरात सकाळपासून रिमझिम पावसाची सतत धार सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे.
सलग २ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून मुठा नदीत होणारा विसर्ग वाढवला
सध्या कुठल्या धरणातून किती विसर्ग
कासारसाई: ५६० क्युसेक्स
वरसगाव धरण: ३९०९ क्युसेक्स
खडकवासला धरण: ४१७० क्युसेक्स
भाटघर धरण: १२,११४ क्युसेक्स
पानशेत: ३९९६ क्युसेक्स
पवना: २८६० क्युसेक्स
मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ कासार साई धरण 97 टक्के भरलेले असून धरणाच्या सांडव्यावरून 560 क्लासेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने. पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जर असाच पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अस पाटबंधारे विभागाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. दरम्यान नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस
गगनबावडा मार्गावरील मांडूकली इथं आलं राष्ट्रीय मार्गावर पाणी
राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक रोखली
ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 25 मिनिटे उशिराने धावत आहेत ठाण्याहून मुंबई आणि कल्याण चा दिशेने जाणारी सेवा उशिराने धावत आहे. तसेच रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी साचल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 98 टक्के भरले आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पवना धरण 98 टक्के भरल्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड करांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पवना धरण 98 टक्के भरले असून 1400 क्लूसेस पाण्याचा सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून परिसरात आतापर्यंत 1921 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे..
मेहकर तालूक्यातील पेनटाकळी प्रकल्प, कोराडी प्रकल्प व परतापूर व देऊळगाव सकार्शा येथील धरणामधून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे रस्ते बंद होण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे मेहेकर तहसिलदार निलेश मडके यांनी पत्रक काढून आज 19/08/2025 रोजी मेहकर तालूक्यातील सर्व शाळा, कॉलेज व महाविदयालय यांना सुटटी जाहीर केली आहे.. व पूढील 3 दिवस अतीवृष्टीचा इशारा असल्यामूळे कोणीही कामाशीवाय बाहेर पडू नये. असे आवाहन सुद्धा केले आहे..
- जलसंपदा विभागाचा नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट जारी
- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून करण्यात येणार पाण्याचा विसर्ग
- तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यास धरणातून केव्हाही पाणी सोडलं जाणार
- गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता
- नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.. जिल्ह्यातील जेमतेम प्रकल्प ओहरफ्लो झाले आहेत, माध्यम प्रकल्प मन हा प्रकल्प सुद्धा ओहर फ्लो झाला असून प्रकल्पचे पाचही दरवाजे 50 सेमी ने उघडले असून प्रकालपटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे... मन नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावाना जिल्हा प्रशासनाच्या वाटीनं सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..
कोल्हापूरच्या पंचगंगेची इशारा पातळीकडे संथ गतीने वाटचाल
पंचगंगेची पाणी पातळी 34 फुट 9 इंचावर पोहचली
राजाराम सह 57 बंधारे पाण्याखाली; बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत
राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडेच
जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात पावसाचा तुफानी पाऊस
राधानगरी धरणाच्या सातही स्वयंचलित दरवाज्यातून 10 हजार क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून 1500 क्युसेक असा एकूण 11500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
काजळी नदीने ओलांडली इशारा पातळी
नदीने पातळी ओलांडल्याने चांदेराई लांजा रस्त्यावर पाणी
रसत्यावर जवळपास तीन फुट पाणी,चांदेराई लांजा अशी वाहतुक ठप्प
हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता
भितीने व्यापाऱ्यांची सामानाची हलवाहलव
तब्बल चार दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील सकल भागासह अनेक इमारती चा ताजमजला पाण्याखाली गेला आहे.
आज पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यानुसारच सकाळपासून पावसाने संततधार पडण्यास सुरुवात केली आहे.
मध्यरात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस
अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव मालाड बोरिवली कांदिवली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यासोबतच मुख्य रस्त्यांवर देखील साचले पाणी
अंधेरीतील चार बंगला, अपना बाजार, नवरंग सिनेमा परिसरातील रस्ते जलमय
इसापूर प्रकल्पातील विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी, संगम चिंचोली या गावात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालाय.
मागील तीन ते चार दिवसांपासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरुये या मुसळधार पावसाने नवी मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढलय.... नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची सततधार सुरु आहे. तर सकाळपासून पावसामुळे ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम सुरूच आहे. तसेच खारघर येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचला आहे त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास निर्णय
मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सध्या धरण 72.66 टक्के भरले असून, ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहे. बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाले, ओढे आणि साठवण तलावांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला आहे. सोमठाणा धरणातून तालुक्यातील जवळपास अर्ध्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेतकरी आपल्या फळबागा आणि शेतीसाठी याच पाण्याचा वापर करतात. बदनापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमठाणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. उउदगीर तालुक्यातल्या धडकनाळ बोरगाव परिसरात, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. 3बैल35 शेळ्या. ह्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.दरम्यान या पावसामुळे गावात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल आहे. तर जिल्ह्यातील 13 लघु मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रतिवृष्टीने नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी प्रशासन गावात तळ ठोकून आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सर्वात पूर परिस्थिती निर्माण झाली होती .. चिखली तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे .. चिखली ते बुलढाणा रस्त्यावरील हातणी गावाजवळील असलेल्या राम नदीला महापूर आल्याने हा रस्ताच बंद झाला .. मात्र एका उत्साही तरुणाने धाडस करण्याचा प्रयत्न केला त्याने दुचाकी पुराच्या पाण्यात टाकून पूल पार करण्याचा प्रयत्न केला त्याची दुचाकी घसरून तो वाहायला लागला असल्याने नागरिकाणी ताटडीने धावं घेतली व त्या तरुणाला पाण्याबाहेर खेचले मात्र त्याची दुचाकी वाहून गेली...
मध्यरात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस
अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव मालाड बोरिवली कांदिवली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यासोबतच मुख्य रस्त्यांवर देखील साचले पाणी
अंधेरीतील चार बंगला, अपना बाजार, नवरंग सिनेमा परिसरातील रस्ते जलमय
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे.जिल्ह्यातील 16 ही तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत सरासरी 567.9 पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात 603.2 मिमी पाऊस कोसळला आहे.या पावसाची टक्केवारी ही 106.2 इतकी आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे लाखो हेक्टर वरील पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालाय. अशात ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून उमरखेड,महागांव,आर्णी,घाटंजी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.पुरामुळे जिल्ह्यातील सहा मार्गावरील वाहतुकीस बंद करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी पुलाला भगदाड पडल्याची घटना घडली आहे. या भगदाड पडलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्या उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वाहनचालकांना या पुलावरून जाताना सावकाश वेग कमी करून जावे लागत आहे. महामार्गावर पावशी येथील या पुलावर नेहमीच मार्ग खचतो. या पुलावर महामार्ग ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, त्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. भगदाड पडल्याची घटना समजताच रात्री ठेकेदार कंपनीकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली.
पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट. कित्येक दिवस पडणाऱ्या पावसाची रात्रीपासून रीपरिप कायम.आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज.जिल्ह्यातील शाळा ,अंगणवाडी आणि महाविद्यालयाला जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या सूर्य नदीला मोठ्या प्रमाणात पूर.आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना आवाहन.
जोरदार पाऊस आणि पुर सदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर आज रायगडमधील शाळा, महाविद्यालय बंद रहाणार
० गेल्या तीन दिवसां पासून कोसळणाऱ्या संतत धार पावसानंतर रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, नागोठणे येथे पुर सदृष्य परिस्थिती
० काल सावित्री, आंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली होती
० आज सर्वच नद्या नियंत्रण रेषेवरून वाहत असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात
० जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
० माणगावमध्ये काळ नदी, घोड नदीसह सर्वच स्थानिक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने माणगावमध्ये पुर परिस्थिती
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी येथील पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीये. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तलावातील पाणी शेतशिवारात पसरले असून, शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू झाला आहे. कालही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. रात्री काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसाची सकाळपासून संततधार सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गडनदी, भंगसाळ, तेरेखोल या मुख्यनद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच मच्छीमारांनाही समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पाश्र्वभूमीवर हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज सकाळी पासून ठाणेकरांना पावसाचा फटका पडण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातून घोडबंदर रोड चा दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तसेच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सलग दोन दिवसापासून जालन्यातील परतुर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठा झपाट्याने वाढ होत असून या प्रकल्पाचा पाणीसाठा आता 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणाची आठ दरवाजे उघडले असून 3 हजार 958 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे..मागील दोन दिवसापासून जालना जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे तर अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे..
बुलढाणा जिल्हयातील चिखली तालुक्यात रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने चिखली शहराजवळील जांबुवंती नदीला महापूर आलाय.. त्यामुळे नदी काठावरील हजारो हेक्टर वरील शेती पाण्याखाली आली असून शेतात पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे . . अनेकांची शेती खरडून गेलीय, सोयाबीन उडीद मूग तूर पिकांसह इतर पिके वाहून गेलीय . शेतात पाणी असल्याने या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ..
सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी
चिपळूणची वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ
चिपळूणच्या बाजारपूल परिसरातील सखल भागात शिरलं पाणी
खेडमधील जगबुडी नदीची धोकापातळी पहाटे 4 वाजता झाली कमी
मात्र सध्या जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे
हिंगोलीत आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे यामध्ये एका शेतकऱ्यासह धबधब्यावर पोहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकांचा समावेश आहे दरम्यान धोंडीराम घोगरे असे शेतकऱ्याचे नाव आहे तर गोविंद लोंढे असे धबधब्यावर सेल्फी काढताना वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे या दोन्ही घटनांनंतर मृतांच्या गावावर शोककळा पसरली होती दरम्यान हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना धोकादायक स्थितीत प्रवास टाळावा व पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे
रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसाचा फटका संपूर्ण माणगाव तालुक्याला बसला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कळमजे येथे नदीला आलेल्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रात्री पाच तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. महामार्गवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक प्रवाशांना रात्री चालत रस्ता पार करण्याची वेळ आली. येथील बामणोली, भादाव गावचे रस्ते रात्री पासून पाण्यात खाली असल्याने संपर्क तुटला आहे तर माणगाव रेल्वे स्टेशन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर अद्याप ओसरलेला नसला परिस्थिती नियंत्रणात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी पुलाला भगदाड पडल्याची घटना घडली आहे. या भगदाड पडलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्या उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वाहनचालकांना या पुलावरून जाताना सावकाश वेग कमी करून जावे लागत आहे. महामार्गावर पावशी येथील या पुलावर नेहमीच मार्ग खचतो. या पुलावर महामार्ग ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, त्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. भगदाड पडल्याची घटना समजताच रात्री ठेकेदार कंपनीकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.