टेम्पो चालक व कार चालक किरकोळ जखमी
घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल
टेम्पोचे व कारचे या अपघातात नुकसान
चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली. जुनोना जंगल परिसरात कुड्याची फुले तोडायला गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आले आहे. जखमी वडिलाचे नावे अरुण कुपसे तर विजय कुपसे असे मुलाचे नाव आहे. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतली. त्यांनी अस्वलाला पिटाळून लावण्याचा जोरकस प्रयत्न केला.
वाशिम शहराचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी मंदिरात आज तान्हा पोळा भरवण्यात आलाय. शहरातील बालगोपाल आपले सजवलेले माती आणि लाकडी बैल घेऊन या तान्ह्या पोळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा अर्चना करून या तान्हा पोळ्याला सुरवात झालीय.. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा तान्हा पोळ्याचा उत्सव साजरा केला जातो. जवळपास दोनशे सात वर्षा पासून हा तान्हा पोळा भरण्याची परंपरा कायम आहे. वाशिमकराचं ग्रामदैवत असलेल्या भगवान बालाजी मंदिराच्या सभामंडपात हा पोळा पार पडतो.
महिलांसाठी सुरु केलेली कोणतीही योजना पुढील पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वाशिम शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आज बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीकृष्ण द्वारका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाशिम शहरात द्वारका उत्सव साजरा करण्याची 107 वर्षांची परंपरा आज ही कायम आहे.या द्वारकेची मिरवणूक वाशिम शहरातील मुख्य मार्गांनी काढण्यात आली.पर्यावरणा प्रती जनजागृती व मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या या द्वारका मिरवणुकीत शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचं कौतुक
कलाकाराचा मानसन्मान कस राखलं जाईल यासाठी शरद पवार साहेबांनी मनापासून प्रयत्न केले- अजित पवार
महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. 37 वर्ष शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेल्या सहसंपर्कप्रमुख व माजी महापौर त्रंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांना हा राजीनामा पाठवला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटात पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा-वाशेरे गटातील भिमाशंकर,पदरवाडी,वेळवली या तीन गावांना वघळण्यात आलय
मत चोरी प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरु असताना नव्याने होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना गट आणि गणाची रचना करण्यात आली यामध्ये भिमाशंकरसह दोन गावांचा मतदार यादीत समावेश नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय
परभणीच्या राणीसावरगाव ग्राम पंचायत ग्रामसभेत गोधळ हाणामारी
सरपंच पती कडून शिवीगाळ केल्या प्रकरणी २ जणांवर गुन्हा
तर सरपंच पती वरही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल
पिसाळलेल्या कुत्र्याची राजगुरुनगर शहरात दहशत..
दोन जणांना चावा जखमींवर उपचार सुरु
सरदार चौक,बाजारपेठ,मोमीन आळी परिसरात कुत्रा अजुनही फिरत असल्याने नागरिकांमध्ये भिती
पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली. जुनोना जंगल परिसरात कुड्याची फुले तोडायला गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आले आहे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे. यासाठी जालना जिल्ह्यामध्ये गावागावात मराठा समाजाच्या चावडी बैठका पार पडल्या आहे.चावडी बैठकानंतर आज जालन्यातील अंबड रोडवरील एका मंगल कार्यालयामध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मुंबई आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर गावागावातून मराठाबांधव मुंबईला जाणार आहे त्यासाठी देखील नियोजन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आंदोलनासाठी 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहे.
आम्ही बारामतीत एक परिपत्रक काढला आहे
ज्यांनी होर्डिंग्ज लावली त्यांच्या वरही गुन्हा दाखल होणार आणि ज्याच्यासाठी होर्डिंग्ज लावली त्याच्यावर ही आम्ही गुन्हे दाखल करणार
अशा कायदा तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात देखील करत
लोक माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देणारा होर्डिग लावतात आणि त्या होर्डिंग्ज मध्ये आमच्या दोघांच्या फोटो पेक्षा स्वतःचाच फोटो मोठा लावतात
वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मालेगाव, मंगरूळपीर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे..जिल्ह्यात इतर ठिकाणीही ढगाळ वातावरण आहे. सतत पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण 2025- 26 पूर्व तयारी प्रारंभ सोहळ्याला उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमुख उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच देशात राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या सोहळ्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केल जाणार आहे.
ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
तुळजापूरहून- निलेगावकडे निघालेल्या एसटी बसला तीर्थ बुद्रुक जवळ लागली अचानक आग
प्रवाशाने भरलेल्या बसला आग लागल्याने प्रवाशांची धावपळ
ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला
एस टी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, बसच्या केबिनमध्ये स्पार्किंग झाल्याने बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती
संभाजी कॉलनीत पाडसवान कुटुंबीयांवर निमोणे कुटुंबीयांनी केला होता सशस्त्र हल्ला.
हल्ल्यात प्रमोद निमोणे यांचा झाला होता. मृत्यू तर त्याचे आई-वडील आणि मुलगा झाले होते गंभीर जखमी
न्यायासाठी सिडको ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा द्यावी आंदोलकांची मागणी
मकोका अंतर्गत कारवाई आरोपींवर करावी अशी देखील आंदोलकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे
CCTV जेवढे आरोपी दिसत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी
बीडमध्ये आज ओबीसी समाज बांधवांची आज बैठक पार पडत आहे या बैठकीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ही उपस्थित आहेत मात्र या बैठकीकडे ओबीसी समाज बांधवांनी पाठ फिरवली असून बैठकीमधील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत नाईलाजास्तव मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात करावी लागली मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वादानंतर ही पहिलीच बैठक होत आहे आणि लक्ष्मण हाके यांच्या तथाकथित व्हिडिओ नंतर बैठकीवर परिणाम झाला आहे.
मराठा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर ओबीसी समाजही आक्रमक झाला असून आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी समाज बांधवांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके पहिल्यांदाच बीड मधील बैठकीला एकत्र आले आहेत.
मावळ तालुक्यातील जांबे येथून रिंग रोडला सुरुवात होणार असून मावळ तालुक्यातील सांगवडे, दारुंबरे, साळुंबरे, यासह अनेक गावे या रिंग रोड मुळे बाधित होणार आहे. या रिंग रोडला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध दर्शविला आहे. यापूर्वीच मावळतील शेतकऱ्यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, पवना धरण याला जमिनी दिल्या त्यामुळे हे शेतकरी अल्पभूधारक झालेले आहे. आत्ता सरकारने रिंग रोड तयार करण्याचा घाट धरलेले आहे. मात्र या रिंग रोड साठी आमचा जीव गेला तरी चालेल पण एकही इंच जमीन आम्ही रिंग रोडला देणार नाही. पवना धरण तयार करीत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र त्याचाही परतावा मिळाला नाही.
अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्याचा राग चौघा जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या कोंढव्यातील मिठानगर येथील वाहनांवर काढला. ३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून त्यांनी परिसरात दहशत माजविली. कोंढवा पोलिसांनी रात्रीतून चौघांपैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
धुळे शहराजवळील मोहाडी परिसरामध्ये चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याची संधी साधत बंद घरातील दरवाजाचे कुलूप व कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत, घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर हात साफ करून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे,
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल धाराशिवे येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादग्रस्त वक्तव्य केले, शेतकऱ्यांनी निसर्गाचा ऱ्हास केला ही कर्माचे फळ त्यांना भोगावे लागते. त्यावर आता शेतकरीचे चळवळीतील नेते विजय घाडगे यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेता झालेल्या पाशा पटेल यांनी आज शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर पाय दिंडी करणाऱ्या पाशा पटेल यांनी, स्वतः आत्मपरीक्षण करावं. अशी संतप्त प्रतिक्रिया विजय घाडगे यांनी दिली आहे..
मराठा आरक्षणासाठी 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे. तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात उद्या मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णय बैठक बोलावण्यात आलीय.. या बैठकीतून राज्य सरकारला अंतिम इशारा दिला जाणार आहे. बैठकीची तयारी पूर्ण करण्यात आलीय.. याला बैठकीचे नाव देण्यात आले असते तरी सभेची तयारी इथे करण्यात आलीय. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रति आव्हान म्हणून कोणी मोर्चा काढत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा बीड मधील मराठा समाजाने दिला. तर आमचा लढा ओबीसी सोबत नसून सरकार सोबत आहे. मोठ्या भावाला ओबीसी समाजाने साथ द्यावी.. त्याची उतराई मराठा समाज करेल असं भावनिक आवाहन देखील यावेळी मराठा समाजाने केलं..
घडलेला प्रकार निंदनीय, काही तरुणांकडून झालेली गोष्ट निंदनीय
दोन्ही समाजाकडून दिलगिरी व्यक्त
घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून सीसीटीव्ही ची पाहणी
दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर होणार कडक कारवाई
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची माहिती
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा आणि अक्राणी परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस.....
सततच्या पावसामुळे शेती पिक खराब होण्याची शक्यता....
पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणी साठत देखील वाढ होणार आहे...
गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारली होती मात्र गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेती पिकांना जीवदान मिळणार असून जिल्ह्याच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे....
वाशिमच्या अनसिंग येथील स्वयंचलित (AWS) हवामान केंद्रातील पाणी मोजमाप यंत्र लीक असून वायरिंग जळालेली आहे, त्यामुळे खोटी पावसाची नोंद होत आहे.ज्या दिवशी मुसळधार पाऊस झाला त्या दिवशी केंद्राने कमी पाऊस दाखवला, तर अनेक वेळा जोरदार पावसाच्या दिवशी "NIL" पाऊस नोंदवला.
या चुकीच्या नोंदींवर आधारित पंचनामे तयार झाल्याने अनसिंग मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा आरोप करत अनसिंग येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज घोषणा बाजी करत पावसाच्या मोजमापाच्या बोगस अहवालांची होळी करून निषेध केला आहे.
सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुख्यालयातच आता सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. इमारतीच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करूनही म्हाडा मुख्यालयात प्लास्टर व स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असून, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील विद्युत विभागात अचानक स्लॅबचे प्लास्टर कोसळले. हे प्लास्टर थेट उपअभियंत्यांच्या कॅबिनवर पडले. सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेच्या वेळी काही कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र प्लास्टर कोसळलेल्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. तरीदेखील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अहिल्यानगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अमर इन परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. कुरिअर वाहतूक करणारा छोटा टेम्पो विरुद्ध दिशेने येत असताना, पुण्याकडे जात असलेली थार गाडी याच्याशी जोरदार धडक झाली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस ठाण्यात वाहनधारकांनी तक्रार नोंदवण्यासाठी हजेरी लावली आहे.
वाहनांच्या चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशी मागणी होत आहे.
शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर आज नगरपरिषदेने बुलडोजर फिरवत कारवाई केली. टपऱ्या, बंद टपऱ्या, हातगाड्या, दुकानदारांची बाहेर काढलेली शेड, बोर्ड, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेली ही कारवाई अनेक दुकानदारांना पूर्वसूचना व नोटिसा देऊनच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचे म्हणणे ऐकून, पाहणी करून व अतिक्रमणधारकांना पूर्वीच ती काढून टाकण्याची विनंती करूनही कारवाई न झाल्याने अखेर आज बुलडोजर फिरविण्यात आला. यापुढे शहरात अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगरपरिषद सज्ज राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
साडेसाती मुक्तीपीठ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी अमावस्या निमित्ताने शनी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी. शनि अमावस्या निमित्ताने शनीमाडळ गावात मोठी यात्रा भरत असते आज पहाटेपासूनच शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश यासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक हे शनिमांडळ देवस्थानला येत असतात त्यासोबतच साडेसाती दूर व्हावी यासाठी अनेक राजकीय नेते देखील शनि देवाकडे प्रार्थना करत असतात आज शनि अमावस्या असल्यामुळे शनी मंदिरात भाविकांचे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.. यावेळी नंदुरबारचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहपरिवार शनि देवाचा दर्शन घेत पूजा अर्चना केली आहे..
मुंबईचा जोगेश्वरी परिसरात इमारतीच्या तळमजल्याला आग
जोगेश्वरीतील लालानी हेरिटेज पार्क इमारतीच्या तळमजल्यावर महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग सुरू
पे अँड पार्किंग मध्येच आग लागल्यामुळे रहिवाशांचा उडाला गोंधळ
त्याच ठिकाणी काही वाहनांची देखील इलेक्ट्रिक चार्जिंग सुरू असताना लागली आग
मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
सध्या पुल्लिंग ऑपरेशनचे काम सुरू
आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजले नाही
इंदापूर मध्ये अतिक्रमण काढताना राडा...
इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथिल गायरानावरती अतिक्रमण काढण्यादरम्यान पोलीस आणि पारधी समाजात झाली चकमक... पोलिसांनी केला लाठीचार्ज... पारधी समाजाच्या महिला व लहान मुलांवरती पोलिसांनी केला अमानुषपणे लाठीचार्ज...
सोशल मीडिया वरती व्हिडिओ होतोय वायरल...
इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या पाच जणांवर गुन्हा दाखल...
लाठी चार्ज करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला अशी नागरिकांमध्ये होतेय चर्चा...
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा शहरात पाहणी दौरा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार शहरातल्या मुख्य गणेश मंडळांची करणार पाहणी
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती पासून अमितेश कुमार करणार मंडळांची पाहणी
मंडळाने भेट देत मंडप, शहरातील वाहतूक आणि शहरातील पोलीस बंदोबस्ताची अमितेश कुमार घेणार आढावा
पोलीस आयुक्त सोबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाहणी साठी दाखल
० मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुरु
० माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
० गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत
० चाकरमान्यांच्या कोकणच्या वाटेवर वाहतूक कोंडीचे विघ्न
० माणगावमधील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या
तळवाडे-भामेर ग्रामस्थांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू
उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, डॉक्टरांनी तपासणी केली
तब्येत खराब असतानाही आंदोलनावर ठाम निर्धार
हरणबारी ते तळवाडे-भामेर कालव्याचे काम ४५ वर्षांपासून अपूर्ण
सिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायम
कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप
मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार
महापालिका शाळेच्या खाजगीकरण विरोधात काँग्रेस आक्रमक
मालाड मालवणीतील महापालिका पब्लिक स्कूलचे प्रशासनाने घातला खाजगीकरणाचा डाव
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पोलिसांनी आंदोलकांना अडवले
पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून निवेदन देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
- बार्शी तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला फटका
- बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी
- बार्शी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले तुडुंब वाहिल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी
- माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करत पंचनाम्याची मागणी केली
- उत्तर बार्शीच्या भागातील कोरेगाव, चुंब, खडकोणी, बानसळे, आगळगाव या ठिकाणी करण्यात आली पाहणी
- बार्शी तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीना भेटून परिस्थिती सांगणार
अमित ठाकरेंनी आज आशिष शेलारांची भेट घेतली. या भेटीत खासगी शाळेतील परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.
लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळाती वझर आघाव, भुमराळा, सावरगाव कासारी, शिवरात ढगफुटी सदृश्य पावसाने पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरातील सर्व शेताना तलावाचे स्वरुप् आले असून शेतातील पिके पूर्ण नष्ट झाले आहे... परंतू शासनाने नदी नाल्या काठचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सखल भागातील व सततच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने नदी नाले ही अट रद्द करुन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकरी रघुनाथ आघाव यांनी केली आहे...
अंबरनाथ नगरपरिषदेने मृत्यू दाखल्याचे शुल्क रद्द करण्याची मागणी अंबरनाथ चे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी केली आहे. एखाद्या कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर नागरिक मानसिक व आर्थिक संकटात सापडतात, त्यात मृत्यू दाखल्यासाठी आकारले जाणारे शुल्क हा अतिरिक्त बोजा ठरतो. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मृत्यू दाखला निशुल्क देण्यात यावा, असे निवेदन वाळेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले. अनेक महानगरपालिका व नगरपरिषदांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असून अंबरनाथ नगरपरिषदेकडूनही हा निर्णय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वाळेकर यांनी व्यक्त केली.
तुळजापूर वेस परिसरातील हुतात्मा स्तंभ जवळील फांद्या कपात असताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे झाला मृत्यू
प्रभुराज कलशेट्टी असं मृत पावलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
प्रभुराज कलशेट्टी हे झाडावरून खाली पडल्यानंतर डोक्याला लागला होता जबर मार,त्यामुळे तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते दाखल
मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान या मनपा कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू
कुटुंबाचा आधार असणारा कर्ता पुरुष गेल्याने प्रभुराज कलशेट्टी यांच्या मुलाला अनुकंपाद्वारे नोकरी मिळावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.
ठाकरेसेनेसोबत मनसेच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे..दुसरीकडे राज ठाकारेंपाठोपाठ अमित ठाकरे आज मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली आहे. भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे...दोन दिवसांआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती...त्यामुळे या भेटींची जोरदार राजकीय चर्चा सुरु आहे...
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य या शेत शिवारात महिला शेतात काम करत असताना विद्युत पोलवरील तुटलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. सुलोचना उर्फ वनमाला गजानन कारोळे अस मृतक शेतकरी महिलेच नांव आहे.. सदर महिला नेहमी प्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेली होती.. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.. महिलेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून ती घरातील एकमेव कमावती महिला होती.. त्यामुळे विज वितरण कंपनीने मृतक महिलेच्या कुटुंबियांना भरीव मदत करण्याची मागणी केली जात आहे...
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पंढरपुरात आज चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीत 1लाख 28 हजार क्युसेक इतका सुरू आहे.
दरम्यान काल पासून उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग कमी केला आहे. आज सकाळ पासून फक्त 30 हजार क्युसेक इतका विसर्ग ठेवण्यात आला आहे.दोन दिवस भीमा नदीला पुर आला होता. पुणे आणि परिसरात पावसाने उसंत घेतल्याने उजनीत येणारी पाण्याची आवक ही कमी झाली आहे. पुराचा धोका टळल्याने नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सावासाठी मोठ्या संख्येत मुंबईकर चाकरमान्यांनी कोकणाकडे कुच केल्याच चित्र मुंबई गोवा महामार्गावर दिसत आहे. आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून कोकणात जाणारे मार्ग फुल्ल झाले आहे. गणपती उत्सावासाठी लागणारे सामान गाडीवर बांधुन कोकणवासीय कोकणात निघाले आहेत तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलिस महामार्गावर उतरले असून वाहतुकीच नियोजन करीत आहेत.
- जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 281 मिलिमीटर पावसाची दमदार हजेरी, सरासरी पावसापेक्षा 105 पट पावसाची नोंद
- मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चार लाख 37 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी केली होती पूर्ण
- ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे 41 हजार हेक्टर पिकाचं नुकसान
- भीमा सीना आणि नदी नाले तलाव यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले
- जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसानाची नोंद
- जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदे
बीडच्या वडवणी मध्ये न्यायालयाच्या इमारतीमध्ये सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे या प्रकरणांमध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ती नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये त्याच न्यायालयातील न्यायाधीश रफिक शेख आणि दीपिकाच्या ज्याच्यास कंटाळून आत्महत्या केल्याचे शेतीमध्ये म्हटले आहे आणि या प्रकरणात न्यायाधीशासह लिपिका विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरू यांच्याकडे न्यायाधीशाच्या शोधासाठी पोलीस तैनात न्यायाधीशाचा पोलिसांकडून शोध सुरू.
मुंबई येथील शेषमलजी जैन हे सराफा व्यापारी खामगाव येथे व्यापारासाठी आले होते. काल सायंकाळी ते खामगाव येथून मुंबईकडे जात असताना मेहकर टोल नाक्यानंतर समृद्धी महामार्गावर त्यांच्या वाहन चालकाने कार थांबवून... मला फ्रेश व्हायचं..! असं म्हणत समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कार थांबवली. त्यानंतर लगेचच मागून एका चार चाकी वाहनाने आलेल्या चार दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या शेषमलजी जैन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या कारमधील साडेचार ते पावणे पाच किलो सोने असलेली बॅग व रोकड घेऊन हे दरोडेखोर फरार झाले .
ओबीसी आरक्षण बचाव पार्श्वभूमीवर बीडमध्ये ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी समाजाची बैठक आज बारा वाजता बीडमध्ये होणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी चलो मुंबईचा नारा दिला असून याच पार्श्वभूमी वरती आता ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीने बीडमध्ये महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केला असून बीडच्या स्वागत मंगल कार्यालयात ही बैठक होणार आहे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच वाघमारे आणि हाके एकत्रित आहेत
पुढील काही दिवस पाऊस कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र,राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस पाऊस कमी राहण्याचे संकेत आहेत
राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शनिवारी तसेच रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा हवामान अंदाज दिला असून 28 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यापर्यंत कोकणातील तुरळक भाग वगळता राज्यात पाऊस कमी राहणार आहे.
28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या कालावधीत कोकण तसेच विदर्भात पाऊस अधिक राहणार आहे.इतरत्र पाऊस कमी राहील
त्यामुळे आठवड्यात पाऊस कमीच असल्याचा अंदाज
तुर्भे MIDC येथील तुर्भे नाका ते महापे या मुख्य रस्त्यावर दररोज भयानक वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध व कामगार वर्ग अत्यंत त्रस्त झाले आहेत.
ठाणे-बेलापूर रोडवरील तुर्भे स्टेशनसमोरील ब्रिजचे काम नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले होते. मात्र तांत्रिक अडचणी व काही लोकांच्या राजकीय स्वार्थामुळे हे काम रखडले. ब्रिजसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूक या रस्त्यावर वळविण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण वाहतूक तुर्भे MIDC, इंदिरानगर, गणपती पाडा, बोनसरी गाव, चुनाभट्टी, आंबेडकर नगर, गणेश नगर या वसाहतींमधून जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वसई विरार शहरातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी वसई पश्चिमेकडील बाभोला नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात तब्बल 22 हजार झाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात आंबा, करंज, सुरुची, कंदब, वड, पिंपळ यांसारख्या स्थानिक आणि पर्यावरणपूरक झाडांचा समावेश होता. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनी सहभाग घेतला होता.
मुंबई गोवा महामार्गाचं काम तब्बल 15 वर्षांपासून रखडलेलं असतानाच गणेशोत्सवाच्या तोंडावर केवळ खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ठेकेदारांकडून तात्पुरती कामं सुरू करण्यात आली आहेत. कुठे डांबर ओतलं जातंय तर कुठे सिमेंटचा आधार घेऊन खड्डयांना झाकलं जात आहे. मात्र या तात्पुरत्या उपायांनी गणेशभक्तांच्या प्रवासात खरंच दिलासा मिळणार का, की पुन्हा काही दिवसांतच रस्ते पूर्ववत खड्डेमय होतील? असा सवाल उपस्थित होत आहे
शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून,घर भरायचे काम केलं,अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.आयुष्यभर त्यांनी लोकांचा वापर करून घेतला,हे लोकांच्या लक्षात आले आहे,हे फक्त मत चोर आहेत, त्यामुळे त्याचे उत्तर लोकांना मतांची रूपाने,
त्यांना दिले आहे,अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.शरद पवार आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मत चोरी झाल्याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर करणार असल्याचे जाहिर केले आहे, यावरून मंत्री गोरे यांनी सांगलीच्या जत मध्ये दहीहंडी सोहळ्या प्रसंगी ही टीका केली आहे.
- गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला दिली धडक
- धडक दिल्यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप
- मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी केल्याचा आरोप
- यानंतर या मराठी माणसाने स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती
- मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय व्यक्तीला समज दिली जात असतानाही त्याने केली अरेरावी
- मराठी बोलण्यास नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप
- नाशिक जिल्हा परिषदेची अंतिम गट गण रचना जाहीर
- ६४ हरकतींवर झाली सुनावणी, ४२ हरकती फेटाळल्या तर १७ अंशतः आणि ५ पूर्ण मान्य
- झेडपीची सदस्य संख्या एका सदस्याने वाढणार
- यंदा जिल्हा परिषदेच्या ७४ गट आणि १४८ गणासाठी होणार निवडणूक
- चांदवड, मालेगाव आणि सुरगाण्यात वाढला प्रत्येकी १ गट
- तर निफाड आणि ओझरचा प्रत्येकी १ गट झाला कमी
- अंतिम गट आणि गण रचनेनंतर आता आरक्षण सोडत जाहीर होणार
- विधान भवनात कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरण
- माणिकराव कोकाटे यांची आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस
- विधान भवनात कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात उडाली होती खळबळ
- रोहित पवार यांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आणला होता समोर
- या नोटीसीबाबत रोहित पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरून कोकाटेंना लगावला टोला
- कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची पुण्यात आज बैठक
बैठकीला निमंत्रित पदाधिकारीच असणार
सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे बोलावली बैठक.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व चार धरणांत मिळून २७.८२ टीएमसी म्हणजेच ९५.४३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी २८.२९ टीएमसी म्हणजेच ९७.०६ टक्के साठा होता.
यावर्षीचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा साठा १ टीएमसीने कमी आहे.पण एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे.खडकवासला धरणातून आजपर्यंत जवळपास १४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले आहे. गेले काही दिवसात खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी.
पुणे महापालिकेचे कामकाज सकाळी पावणेदहा वाजता सुरू होते पण अनेक अधिकारी कर्मचारी हे उशिरा येतात त्यामुळे त्याचा कामकाजाचा परिणाम होत आहे.
अशा अधिकाऱ्यांबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक भूमिका घेतली.
काल सकाळी पावणेदहा नंतर महापालिकेच्या सर्व प्रवेशद्वार बंद केले उशिरा आलेल्या सुमारे ७५० कर्मचाऱ्यांची नावे लिहून घेतली आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आलेली आहे.
यामध्ये सहा विभाग प्रमुखांचा समावेश आहे.या प्रकारामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
मुख्य महापालिका भावना सह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कर्मचारी अधिकारी सकाळी उशिरा येतात आणि संध्याकाळी लवकर निघून जातात.
नवल किशोर राम यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर झाले नाहीत, तर थेट कारवाई होईल. दोन आठवड्यांपूर्वीही उशिरा येणाऱ्यांना ताकीद देण्यात आली होती, मात्र त्यातूनही काही धडा घेतला गेला नाही. त्यामुळे काल सकाळी धडक मोहिम राबवून उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांना थेट प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) संचालकपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
बँकिंग, सहकार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन केंद्राच्या अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
सतीश मराठे सध्या रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अभ्यासपूर्ण भूमिका यामुळे ते ओळखले जातात.
नाबार्डसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळात त्यांच्या समावेशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषीविकास आणि सहकार चळवळीस नवी गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बाणेर पोलिसांनी ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील एका सोसायटीजवळ दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला. अमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत बाणेर पोलिसांनी ही कारवाई केली.
रवी विजय वर्मा (वय १९) आणि कौशेलेंद्र नथुप्रसाद वर्मा (वय २३, दोघे रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हे दोघे मूळचे उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील आहेत. हे दोघेजण एका सोसायटीजवळ गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.
तपासात त्यांच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला.या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.