माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीमध्ये परभणी तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे समर्थक देखील परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन...
थोरात यांचे समर्थक आणि संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी...
बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, बहीण दुर्गा तांबे, कन्या जयश्री थोरात मोर्चात सहभागी...
कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ भव्य मोर्चाला सुरुवात...
संग्राम भंडारे यांच्यावर कारवाईची मागणी...
गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यातील मेहेकर व लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.. या पावसाने दोन तालुक्यात हाहाकार उडाला आहे.. सर्वात जास्त मेहेकर तालुक्यात नुकसान झाले आहे.. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले सोयाबीन चे पिक नष्ट झाले आहे..
गेल्या 5 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला आहे. याच दरम्यान, नदी पार करत असताना एक मालवाहू टेम्पो पुराच्या प्रवाहात अडकला. प्रसंगावधान राखत स्थानिक युवकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात यश आले. या प्रकारामुळे मोठा अनर्थ टळला. हा टेम्पो गावात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी येत होता. मात्र नदीच्या पुलावरून जाताना पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना चालकाने गाडी पुढे घेतली आणि टेम्पो मधोमध अडकून बसला. टेम्पो पाण्यात अडकताच चालकाने आरडा ओरड सुरू केला. परिस्थितीची माहिती मिळताच ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व काही स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. दोऱ्या व जिसीपीचा साहाय्याने आणि मोठ्या काळजीपूर्वक पाण्याच्या प्रवाहातून टेम्पो बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज राज ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण चर्चा सुरु होती. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
मावळात गेले चार-पाच दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीनेही रुद्ररूप धारण केलेले आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र तो अपघात ग्रस्त पूल नदीपात्रातच ठेवण्यात आलेला होता. आता इंद्रायणी नदीने रुद्ररूप धारण केल्यामुळे तो लोखंडी पूल वाहून गेलेला आहे.
उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर आला आहे. पंढरपूर शहरातील सुमारे शंभर घरांमध्ये पाणी शिरले आहे तर तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांमधील ऊसाच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्या उजनी धरणातून भीमा नदी मध्ये 1 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपार नंतर विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाणी पातळी वाढल्याने सखल भागात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या पिराचीकुरोली,वाडीकुरोली,शिरढोण,कौकाळी या गावातील शेतकर्यांच्या उसासह इतर पिकांमध्ये पाणी शिरले आहे.
शहरातील कोंढवा, घोरपडी पेठ परिसरात पुणे महानगरपालिकेकडून कारवाई
अनधिकृत बांधकाम, आस्थापना आणि अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा
पुण्यातील सोमवार पेठ ,घोरपडे पेठ आणि कोंढवा परिसरात काल दिवसभर महानगरपालिकेची अतिक्रमणाची कारवाई
अनेकदा नोटीसा देऊन देखील अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने चालवला हातोडा
प्रकाशा मध्यम प्रकल्प बॅरेजचे 11 दरवाजे तर प्रकाशा मध्यम प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले पूर्ण क्षमतेने....
तापी नदीकाठचा 33 गावांना सतर्कतेच्या इशारा....
प्रकाशा धार्मिक स्थळावर तापी घाटावर जाण्यासाठी भाविकांना बंदी.....
प्रकाशा पुलावरून संत गतीने वाहतूक सुरू.....
तापी नदी काठचा नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचा आव्हान....
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी आगामी संस्था कुंभमेळाच्या नियोजनाची विशेष बैठक होणार आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद राज्य सरकारच्या स्तरावर अद्याप प्रलंबित असतांना नाशिकला पालकमंत्री पद न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत. त्यांनी जिल्ह्यात ७ आमदार असूनही राष्ट्रवादीला पालकमंत्री नाही, असं म्हणत आपला दावा या पदावर दाखवला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. यापूर्वी पालकमंत्री नसले तरी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच कुंभमेळ्याचे नियोजन बघत होते. त्यात सातत्याने ध्वजारोहणाचा मान त्यांना दिला गेल्यामुळे नाशिकचे मंत्री गण आणिआमदार दुखावले आहेत. नाशिकला अद्याप अधिकृत पालकमंत्री पद मिळाले नसले तरी जिल्ह्याचा मीच खरा पालक असं भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य या आधी देखील चर्चेत आलं होतं. आता कुंभमेळ्याची पहिल्या टप्प्यातील कामही परस्पर देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे या निर्णयांबाबत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे भुजबळ घेत असलेल्या सिंहस्थ नियोजनाच्या या बैठकीकडे नाशिककरांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून भाजपमधून बंडखोरी करून दिपक केसरकर यांच्या विरोधात निवडणुक लढविलेल्या आणि याच दरम्यान नारायण राणे हे रवींद्र चव्हाण यांना त्रास देतात अशी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करून खळबळ उडवून देणाऱ्या विशाल परब यांच निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकताच मुंबई येथे विशाल परब यांचा प्रवेश करून घेतला. या प्रवेशानंतर विशाल परब यांनी सिंधुदुर्गात रॅली काढून शक्तीप्रदर्शन केल. मात्र या प्रवेशानंतर भाजप आणि शिंदे गटात नाराजी पसरली आहे. भाजपचा जिल्ह्यातील एकही बडा नेता विशाल परब यांच्या रॅलीत सहभागी झाला नाही. याच विशाल परब यांना पून्हा भाजपमध्ये प्रवेश देणार नसल्याच त्यावेळी राणेंकडून सांगण्यात आल होत. मला विचारल्याशिवाय सिंधुदुर्गात शिंदेच्या शिवसेनेत व भाजपमध्ये कोणाला प्रवेश दिला जात नाही अस अनेकदा नारायण राणे म्हणाले होते. मात्र याच राणेंना अंधारात ठेवून हा पक्ष प्रवेश देण्यात आला का असा सवाल आता उपस्थित होत आहे. विशाल परब यांच्यावर शिंदेच्या शिवसेनेकडून लॅन्ड माफीया अशी टीका झाली होती तर राणेंनी परब हे ड्रग्स माफीया असल्याचा आरोप केला होता. मात्र याच विशाल परब यांना रवींद्र चव्हाण यांनी पक्षात पुन्हा प्रवेश देऊन राणेंना शह दिल्याच बोलल जात आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी विशाल परब यांच्या प्रवेशानंतर खोचक प्रतिक्रीया देत राणेंना डीवचल आहे. राणेंची भाजपमधील ताकद कमी झाली की रवींद्र चव्हाण राणेंना शह देतायत असा सवाल उपस्थित करत नारायण राणे आता ड्रग्स माफीयाच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणार का असा खोचक टोला लगावला आहे.
वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार ते आठवडी बाजारात जाणाऱ्या अडाण नदीवर असलेल्या पूलाची मोठी दुरावस्था झाल्याने क्षतिग्रस्त पुलावून जात असताना मोठे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वेळा आलेल्या नदीला आल्याने पुरामुळे या पुलाची दुरावस्था झाली आहे. पुराच्या पाण्यात पुलाचा काही भाग खरडून गेला आहे. नागरिकांची या पुलावरून मोठी ये-जा असते. या पुलावरून जड वाहतूक सुद्धा होते. त्यामुळे अपघात होण्याच्या अगोदर पुल दुरुस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी होतीये.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चंदनचा रस्त्यावर ओठ प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
चार ते पाच किलोमीटर पर्यंत या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तारेवरची कसरत करत वाहन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नुकताच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे मात्र मराठी सणांकडे आयुक्त दुर्लक्ष करत आहेत मुंबई पेक्षा गावाकडचे रस्ते बरे असा आरोप नागरिकांनी केला आहे
पंढरपूर मध्ये पूरस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे भीमा नदीची पाणी पातळी ही दर तासाला 4000 क्युसेक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या सखल भागामध्ये पाणी शिरू सुरू लागले आहे. दुपारपर्यंत पंढरपूर मध्ये एक लाख 80 हजार क्युसेक पाणी येऊ शकतं त्यामुळे प्रशासनांन सतर्कतेचा इशारा दिलाय नगरपालिकेने जवळपास 100 कुटुंबांचं आता स्थलांतर केलेला आहे आणि गरज पडली तर आणखी कुटुंबाचे स्थलांतर करावं लागणार आहे पंढरपूरच्या ग्रामीण भागात सुद्धा महसूल प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेल्या काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले आहे.
सांगलीच्या कृष्णची पातळी 42 फुटांवर पोचली आहे इशारा पातळी ओलांडल्याने सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर सांगलीच्या ईदगाह मैदान परिसरात सुद्धा पाणी आले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने काही प्रमाणात सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव ग्रामीण भागातील शिक्षणाचा आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमालीची कमी होत चालली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगलीच घटली आहे. जळगाव जिल्ह्यातील ७ जि.प. शाळा दुसऱ्या शाळेत समाविष्ट केल्या आहेत तर २४ शाळा बंद पडल्या आहेत. त्यातच विना अनुदानित ५५ शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे पटसंख्येतील घसरण अशीच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षात बहुतांश शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील कमी होणारी लोकसंख्या, खासगी शाळांचा वाढता प्रभाव, शहरांकडे होणारे स्थलांतर, गावातील सुविधांचा अभाव अशा विविध कारणांमुळे जि.प. शाळांची पटसंख्या घसरत आहे. पूर्वी एका घरातून दोन किंवा तीन मुले शाळेत जाणारी होती पण, आता मात्र सीबीएसई शाळांकडे कल वाढला आहे. ५५ स्वयं अर्थसहाय्यित शाळाही विद्यार्थी येत नसल्याने बंद पडल्या आहेत.
वसंत विहार हायस्कूलजवळ रस्त्यावर पार्क केलेल्या MH04 JV 6539 वाहनाला अचानक आग लागली. गाडीला मोठा नुकसान झाल्याची नोंद आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी तातडीने कुलिंग ऑपरेशन करून आग नियंत्रणात आणली. प्राथमिक माहिती नुसार, शॉक सर्किटमुळे आग लागल्याचे अनुमान आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कृष्णेची पातळी ही 42 फुटावर गेली आहे. इशारा पातळी 40 ओलांडली आहे. धोका पातळी कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट,मिरज कृष्णा घाट कुरने वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 150 च्या जवळपास कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.
पुण्यातील वाघोली भागातील तांबे वस्तीत गुन्हे शाखेने कारवाई करत ७६ लाख रुपये किमतीचा एम डी ड्रग्स जप्त करत २ तरुणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघोलीच्या तांबे वस्ती मोठी कारवाई केली. राजस्थान राज्यातून आलेल्या रामेश्वरलाल मोतीजी अहिर आणि नक्षत्र हेमराज अहिर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३५१ ग्राम MD (मेफेड्रॉन) जप्त केले करण्यात आले असून बाजारभावानुसार त्याची किंमत ७६ लाख इतकी आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठं नुकसान झाल्याच चित्र असतांना वाशिमच्या कृष्णा गावच्या शेत शिवारात कपाशीच उभ पीक धोक्यात आलंय... अतिपावसामुळे कपाशीचे उभं पीक वाळायला सुरवात झालीय.. साहेबराव राठोड यांच्या असलेल्या एक एकर शेतातील कपाशी पावसात वाहून गेली तर उर्वरित कपाशीची मूळ कुजल्याने झाड वाळू लागली आहेत. त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यावर मोठ्या संकट ओढावल असून, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
लातूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातल्या 16 महसूल मंडळाला अतीवृष्टीचा फटका बसलाय. लातूरच्या अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक कपाशीची लागवड करण्यात येते, मात्र यंदा अतिवृष्टीमुळे कपाशीला पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यातील खंडाळी, शेणकुड ,ढाळेगाव, याशिवारातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर तालुक्यातून वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर रागाने नदीकाठच्या शेती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने, शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झाले आहे. तर शेतकरी आता सरकारच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करतोय.
धाराशिव जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून झालेल्या सततच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन,ऊस आणि इतर पिकासह पालेभाज्यांचंही मोठं नुकसान झालंय.शेतकऱ्यांनी पेरलेली मेथी, कोथिंबीर,शेपूच्या शेतात पाणी लागल्याने पालेभाज्या जागीच सडुन गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.धारशिव तालुक्यातील रुईभर येथील शेतकरी किशोर कोळगे यांच्या एक एकरवरील मेथी भाजीच मोठ नुकसान झालय त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे २६ पैकी सात धरणे काठोकाठ भरली
मुळशी, मावळ व भोर तालुक्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली
विसापूर धरण ९९.३९ टक्के, पवना ९९.१५ टक्के, नीरा-देवघर ९७.८५ टक्के भरले आहे. माणिकडोहमध्ये मात्र फक्त ४४.१५ टक्के, तर येडगाव धरणात ७० टक्के पाणीसाठा आहे
चिल्हेवाडी ७७ टक्के आणि गुंजवणी ८१ टक्के भरली आहेत
इतर सर्व धरणांत ९० टक्क्यांहून अधिक साठा असून, शहर व जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळाला आहे
मालखेड येथील एका खाजगी कंपनीमध्ये बिबट्याचा वावर
कंपनीच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसताच, कर्मचाऱ्यांनी मोबाईल कॅमेरात बिबट्याचा काढला व्हिडीओ
पाऊस सुरू असल्यानं कंपाउंड वॉलजवळ, झाडाच्या जवळ बसला होता बिबट्या
परिसरातील नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्यानं आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढल्यानं नागरिकांच्यात भीतीचं वातावरण
अनुचित घटना टाळण्यासाठी वनविभागाने, या परिसराची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी
धरण साखळी क्षेत्रात पावसाच्या विश्रांतीमुळे पानशेत धरणातून विसर्ग केला कमी
पुण्यातील ४ ही धरणात मुबलक पाणीसाठा
पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर मिळून २८.१६ टी एम सी पाणीसाठा
गेल्या वर्षी याच तारखेला इतकाच पाणीसाठ्याची होती नोंद
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)
खडकवासला: ८९.८४ टक्के
पानशेत: ९५.५९ टक्के
वरसगाव: ९७.५३ टक्के
टेमघर: १०० टक्के
चार ही धरणे मिळून एकूण पाणीसाठा: ९६.६१ टक्के
आता बातमी आहे रायगड जिल्ह्यातुन गणेश मुर्तींच्या खड्डयांने भरलेल्या मुंबई गोवा मार्गावरून प्रवासाची. गणेशोत्सव आता आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्तांचा कोकणचा प्रवास सुरु होण्या आधी गणेशमुर्तींचा कोकण प्रवास सुरु झालाय. गणेश भक्तांप्रमाणेच खड्डयांनी भरलेल्या या मुंबई गोवा महामार्गावरून गणेश मुर्तींचा प्रवास सुरु झाला आहे. खड्डयांचे विघ्न पार करत सुरक्षितपणे गणेश मुर्ती नेताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एका तासाच्या प्रवासासाठी तब्बल पाच - सहा तासा जात असल्याची खंत वाहन चालकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील वन क्षेत्रातून हजारो ब्रास मुरुमाचे राजरोसपणे बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू आहे. या प्रकरणी कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मागणी केली जात आहे.
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अजित पवार हे वर्धेत सकाळी साडे सात वाजता पोहचणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहे. त्यानंतर हिंगणघाट येथे माजी आमदार राजू तिमांडे यांचा पक्ष प्रवेश सुद्धा होणार आहे. सकाळपासूनच कामाची सुरवात करणारे मंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आहे.त्याच पद्धतीने ते वर्धेत येणार असून सकाळी आठ वाजताच अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. अजित पवारंच्या बैठकीच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.
अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली. याआधीचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली झाल्याने मिना यांची अकोला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच विविध विभागप्रमुखांची ओळख करुन घेतलीय. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केलीय. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत, जिल्हा नियोजनभवन, उपाहारगृह, अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केलीय. यावेळी यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतेय.
अकोल्याचे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू जवळ ही घटना घडली. अकोल्याहून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला एका अज्ञात वाहन धडक दिली होती, यामध्ये दुचाकी वरील दोघेजण गंभीर स्वरूपात जखमी झाले. स्थानिक नागरिकाच्या मदतीने तातडीने दोघांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात ॲम्बुलन्सद्वारे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.
भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी अकोल्यातील मुर्तिजापूर सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली. यादरम्यान, रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आलाय.. रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करताना औषध भंडार, आहार विभाग आणि प्रत्येक वार्डमधील रुग्णांची सुविधा देखील तपासल्या. तर काही कर्मचारी रजिस्टरवर सही करून गैरहजर असल्याचे आमदार पिंपळे यांच्या निदर्शनास आले. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना करून, संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करत 15 दिवसांचे मानधन कपात करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, रुग्णालयामध्ये येणार्या प्रत्येक रुग्णाला योग्य वेळी, योग्य सुविधा मि
भीमा खोर्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्यात आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणार्या विसर्गात मोठी वाढ केली आहे. आज पहाटे पासून 1 लाख 30 हजार क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात आला आहे. भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सकाळी 6 वाजता कृष्णेची पातळी ही 42 फुटावर गेली आहे. इशारा पातळी ओलांडली आहे. धोका पातळी कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट,मिरज कृष्णा घाट कुरने वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 150 च्या जवळपास कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. हळूहळू पाणी वाढत आहेत. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपने कोकणात मोर्चेबांधणाला सुरुवात केलीय चिपळूणमधून प्रशांत यादव तर सिंधुदूर्गमधील युवा नेतृव विशाल परब यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश झालाय. आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत देखील भाजच्या काही नेत्यांनी दिलेत त्यामुळे कोकणात भाजप वाढवण्यासाठी हे दोन्ही जिल्ह्यातील पक्ष प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत विशाल परब यांनी पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर पक्ष कारवाई देखील झाली होती मात्र पुन्हा ते स्वगृही परतलेत रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच जोरदार स्वागत देखील करण्यात आलय.
अंबरनाथमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्यावतीने आयोजित मंगळागौर कार्यक्रम मंगळवारी महिलांच्या तुफान गर्दीत पार पडला. ग्लोब हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यापूर्वी अंबरनाथ पूर्वेत मोठ्या गर्दीत मंगळागौर कार्यक्रम पार पडला होता. यानंतर आता अंबरनाथ पश्चिमेत उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे खेळ, नृत्य सादर केली. मीना वाळेकर यांच्या सून प्रणाली वाळेकर यांनी सासू सुनेच्या नात्याचे भावनिक क्षण उलगडणारं हृदयस्पर्शी नृत्य सादर केलं, जे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. या कार्यक्रमाचं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कौतुक केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.