वाहतूक कोंडी मुळे मुंबईकरांना जो मनस्ताप झालेला त्या मुळे मूड इंडिगो रद्द
आई आई टी मुंबई ने घेतला निर्णय
काल दिवस भर पवई , साकी नाका, चांदिवली विभागात ट्रॅफिक जाम
- तपासणीदरम्यान विविध त्रुटी आढळल्यामुळे ७ स्कूल बस, स्कूल व्हॅनवर दंडात्मक कारवाई
- १ लाख २४४ रुपयांचा कर वसूल
- नियम डावलून स्कूल बस, स्कूल व्हॅन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काँग्रेसला उतरती कळा लागल्याच दिसत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह काही नगरसेवक यांनी सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय ,त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या लातूर शहर महापालिकेत यावेळी निवडणुकीआधीच काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसतंय., काँग्रेसचे नेते तथा लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांची या निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढू असे संकेत स्वतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर दौऱ्यावर असताना दिलेत
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर बंद असल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ६ डिसेंबरला मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात अचानक पाहणी केली. तेव्हा किमोथेरपी सेंटर बंद असल्याचे पाहून आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र, सात दिवसांनंतरही जिल्हा सामान्य रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर बंदच आहे. बंद किमोथेरपी सेंटरप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांना कारणे दाखवा नोटीसा बजवण्यात आली आहे. सात दिवसात बंद पडलेले सेंटर सुरू न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचेही नोटीसित नमूद करण्यात आले आहे.
कोकणातील सध्याचे वातावरण आंबा अर्थात हापूस आंब्यासाठी पोषक आहे. रात्री पडणारी थंडी यामुळे आंबा मोहरासाठी पोषक वातावरण असल्याचे बागायतदार सांगतात. सध्या कोकणात रात्रीच्या वेळेला कडाक्याची थंडी आणि दिवसा कडकडीत ऊन असं वातावरण आहे. त्यामुळे वातावरण बदलाने मागील काही महिने चिंतेत असलेला हापूस उत्पादक शेतकरी सध्या वातावरणाच्या बाबतीत समाधान व्यक्त करतोय. लांबलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा कमी प्रमाणात असणार आहे
आमचं सरकार आल्यावर आम्ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो धनगरांच्या समोर जाहीर सभेत आश्वासन दिले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचा प्रश्न सोडवतो.. मग आता क्या हुआ तेरा वादा? पण मात्र अजूनही आम्हाला आरक्षण मिळाले नाही त्यामुळे 21 जानेवारीला राज्यातील सखल धनगर समाज मुंबईच्या दिशेने कुच करणार असून लाखोंचा मोर्चा हा मुंबईला धडकणार असल्याचं धनगराच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे दीपक बोऱ्हाडे यांनी अमरावती येथे धनगर समाज बांधवांच्या बैठकीमध्ये सांगितलं, तुम्ही दिलेल आश्वासन तुम्ही पाडले नाही,जर सरकार आम्हाला फसवत असल तर सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मतं नाही हा नारा घेऊन आम्ही प्रत्येक धनगर वाड्यात तांड्या वस्तीत जाऊ, असा थेट इशारा दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारला दिला आहे
वाशिम जिल्ह्यात एक्सप्लोसिव्ह साहित्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी चोरी गेलेल्या विहीर फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे १ लाख ७७ हजार रुपयांच्या डेटोनेटरचा साठा वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सावरगाव बरडे शेतशिवारात छापा टाकत सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेले सात नायलॉनच्या गोण्यांमधील डेटोनेटर जप्त करण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत.
राज्यात महायुतीचे संकेत देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील प्रत्येक महानगरपालिकेत युती करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत , युतील 13 इतर पक्षांसोबत देखील आम्ही चर्चा सुरू केली आहे, त्यामुळे लातूर महानगरपालिका निवडणुकी महायुती होणार असल्याचे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर येथे दिले आहेत,
अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ; 1 लाख 64 हजार 532 मतदारांची नोंद
वाढलेल्या मतदारांमुळे 53 नवे मतदान केंद्र.एकूण मतदान केंद्रांची संख्या 786 वर.
अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली;मनपा निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात
प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी पूर्ण; मतदार सुविधांवर विशेष भर देण्यात येणार
गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) सातत्याने ‘मध्यम’ (१०१-२००) ते ‘खराब’ (२०१-३००) या श्रेणीत
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती, कचरा जाळण्यावर कडक बंदी, बांधकाम स्थळांवरील धूळ नियंत्रण आणि नियमांचे पालन न करणाऱ्या ठिकाणी काम बंद करण्याच्या उपायांचा आता होणार समावेश
शहरात ऑक्टोबर २०२५ पासून १५ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या सुमारे ७६ दिवसांपैकी तब्बल ४८ दिवस ‘मध्यम’ एक्युआय नोंद
डिसेंबर महिन्यातील ६ दिवस ‘खराब’ श्रेणीत एक्युआय नोंद
महानगरपालिकांच्या निवडणुकींचे बिगुल वाजताच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने देखील आपली तयारी पूर्ण केली. महापालिका क्षेत्रातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 4 लाख 54 हजार 430 मतदारांची नोंद महापालिका क्षेत्रात झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आचारसंहिता कक्ष आणि तक्रार निवारण कक्षही कार्यान्वित करण्यात आलेत. तत्काळ तपासणी पथक, व्हिडिओ चित्रीकरण पथकाची नियुक्ती करण्यात आली. तर जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीवर 11004 हरकती आल्या होत्या. यापैकी 9486 तक्रारी मान्य करण्यात आल्या तर 1536 हरकती अमान्य करण्यात आलेत. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये कडक आचारसंहितेचे पालन करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.
- घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- अशोका मार्ग परिसरात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये घडली घटना
- डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या भामट्याने खेचली सोन साखळी
- सोन सकाळी खेचत असताना महिलेचा आरडाओरड करत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद
- सोनसाखळी चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
विदर्भाचे काश्मीर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात स्कायवॉकजवळ इतरही आकर्षक स्थळे विकसित होणार.
जिल्हाधिकारी यांनी पर्यटनवाढीवर भर देण्याचे आवाहन केले.
चिखलदरा हे अमरावती जिल्ह्याचे प्रमुख पर्यटनस्थळ असल्याचे नमूद.
पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा वाढवण्यावर प्रशासनाचा भर.
जंगल सफारी व निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय.
स्थानिक आदिवासी संस्कृतीचे जतन व प्रचार करण्यावर भर.
विविध विभागांच्या समन्वयातून विकास आराखडा राबवणार.
चिखलदरा पर्यटन नकाशावर अधिक आकर्षक ठरणार अशी पर्यटकांना अपेक्षा.
गृहमंत्री अमित शहा यांची माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्या मागील काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूक प्रचारात सातपुते आणि मोहिते पाटील यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देण्यात आले होते.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत मला जेलमध्ये टाका मी सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे अशी भूमिका घेतली होती. दरम्यान अकलूजमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असतानाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मोहिते पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
- सन्मान जनक जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा देण्याचा तयारीत
- आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक.
- गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार.
- शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा पक्षाचा दावा.
यवतमाळ नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 18 व 19 डिसेंबर रोजी टपाली मतदान घेतले जाणार आहे. त्यांना टपाली मतपत्रिकेचे वितरण करण्यात आले असून हे मतदान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडणार आहे. शहरातील धामणगाव रेल्वे मार्गावर शासकीय तंत्रनिकेतन येथे मतदान घेतले जाणार आहे.
तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी सहदुय्यम उपनिबंधक रवींद्र तारूशी संगनमत करून जिल्हा उद्योग केंद्राचे आवश्यक प्रमाणपत्र न घेता मुद्रांक शुल्कात माफी दिल्याचे भासवून जमीन विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी केली
बावधन पोलिसांनी दिली न्यायालयाला माहिती
आरोपींनी २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून आर्थिक फायदा घेतला असून, या रकमेसह आरोपींच्या आर्थिक हितसंबंधांचा पोलिस करणार तपास
बावधन पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात ‘प्रॉडक्शन वॉरंट’ घेऊन खडक पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तेजवानीला अटक केली
२३ डिसेंबर पर्यंत तेजवानी ला पोलिस कोठडी
- प्रकाश विठ्ठल कीचक अस जखमीच नाव आहे, ते गाई-म्हशी चारताना जंगलालगत हल्ल्यात गंभीर जखमी.
- दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला, प्रसंगावधान राखत कीचक यांनी अस्वलाशी झुंज दिली, आरडाओरड केली.
- गावकऱ्यांनी धाव घेत जखमीला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
- उपसरपंच संजय ढोक आणि पोलीस पाटील डहारकर यांनी वनविभागाला माहिती दिली.
- उमरेड वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी सक्रिय, वरिष्ठांना कळविले, त्यानंतर जखमीला नागपूर मेडिकलला हलवले.
- घटना एफडीसीएम वन महामंडळाच्या हद्दीत घडल्याची माहिती.
काल पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील ३२ प्रभागातील इच्छुकांच्या अजित पवारांनी घेतल्या मुलाखती
शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनी घेतली अजित पवारांची भेट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक प्रमोद कुटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार असल्याचा अजित दादांचा दावा
अंबरनाथ पश्चिम परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी फिर्यादी पवन वाळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे तशीच फिर्याद नोंदवली जावी, या मागणीसाठी आज पहाटे अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांकडून योग्य पद्धतीने फिर्याद घेतली जात नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या ठिय्या आंदोलनात कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य गुलाबराव करंजुले, तसेच फिर्यादी पवन वाळेकर स्वतः सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत सुमारे 100 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी केली.
- प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि रंजीत कांबळे यांची बैठक
- नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रणजीत कांबळे यांची नियुक्ती
- मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय
- मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबतंही बैठकीत चर्चा
- 19 आणि 20 रोजी होणार नागपुरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉलसमोर भर रस्त्यात एका मद्यपी तरुणाने धिंगाणा घातल्याची घटना घडली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाने ये–जा करणाऱ्या वाहनांना अडवून चालकांना धमकावले, तसेच रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण अचानक रस्त्यावर उभा राहून गाड्यांसमोर झेपावत होता. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी त्याने जवळच्या दुकानांतील साहित्य फेकून दिले व काचफलकांची तोडफोड केल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कल्याण पूर्व परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी तसेच मद्यपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
उद्यापासून प्राथमिक चर्चा सुरू होईल... संपूर्ण महाराष्ट्रात २९ महापालिकेत जे काही २९ कमिटी आहेत. भारतीय जनताचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी हे मिळून चर्चा करून बैठक करतील.महायुतीमध्ये जे काही जागावाटप बद्दल जो काही निर्णय आहे. तो होईल. जिथे कुठे अडचण येईल तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि प्रदेश अध्यक्ष सोबत आमचे प्रमुख लोकांना घेऊन निर्णय घेऊएकनाथ शिंदे
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढणार का.. यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. तर नगर महानगरपालिकेत महायुती म्हणून सामोरे गेलं पाहिजे अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. निवडणुका लागल्या आहे यावर आम्ही आता बसून चर्चा करू असा विखे यांनी म्हटलं आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या मैत्रीपूर्ण लढत होतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. मात्र अहिल्यानगर शहरांमध्ये महायुती म्हणूनच सामोरे जावं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने माझा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे
अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीभाडा परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली असून भाजपचे प्रभाग क्रमांक ४ क मधील उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.