डोंबिवली : धक्का लागण्याच्या वादातून ओला चालकाला तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. आंबेडकर नगर येथील सावकार रोड चौका परिसरातील घटना घडली.
मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरांमधून 2 दहशतवाद्यांना पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
लोखंडवाला परिसरात कामधेनू शॉपिंग सेंटरमधून दोन दहशतवाद्यांना पकडल्याचं व्हिडिओमध्ये व्हायरल
मात्र या व्हायरल व्हिडिओ संदर्भात ओशिवरा पोलिसांकडून माहिती समोर
दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस मुंबई परिसरात अलर्ट मोडवर आहे.
जर मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तर कशा पद्धतीने त्यावर कारवाई केली पाहिजे, या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून मॉकड्रिल करण्यात आली आहे.
भुसावळ : राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागात असल्याने आम्ही मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या चार-पाच जागांवर लढविणार आहोत. अथवा कदाचित निवडणूक लढविणार नाही, अशी महत्वाची घोषणा आज आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळात केली.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर चाकणमध्ये वाहतूककोंडी झाली आहे.
वाहनांच्या सात किलोमीटर पर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा
वाहतुककोंडी कोंडीचा फटका मंत्र्यांच्या ताफ्यावर
नाशिक वरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या मंत्र्याचा ताफा वाहतुककोंडीत अडकला
रात्रीच्या वेळी परतीचा प्रवास करणारे प्रवाशी वाहतूककोंडीत अडकले
वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची चांगलीच दमछाक
मुंबईतील अनेक पंपांवर मागील सहा सात तासांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा अंधेरी ते बोरिवलीपर्यंत पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक प्रभाव; पंपांवर लांबच लांब रांगा.
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा येथे धावत्या पी एम पी एम एल बसने अचानक पेट घेतला आहे. पुणे इथून डांगेचौक कडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्य इंजन ने अचानक पेट घेतला आहे. शॉर्टसर्किटमुळे पी एम पी एम एल बस ने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज दिवसभरातील ही दुसरी घटना असून PMPML बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकाच दिवसात दोन बसला आग लागण्याचा घटनेने बसच्या मेंटेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महाबळेश्वरच्या घनदाट जंगलामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.राज्यभरात अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत असताना महाबळेश्वर येथील वेस्ट लॉज बंगलो च्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे. या ठिकाणी असणारा कुत्रा देखील गायब झाल्यामुळे बिबट्यांचा वावर आता मानवी वस्तीत होऊ लागल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश.
प्रसन्न तिडके कोंग्रस नेते नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जातात.
कोपरगाव तालुक्यात एकाच आठवड्यात दोन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाला यश आले आहे., असे असले तरी टाकळी आणि धारणगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे.परिसरात आणखी बिबटे असून शेतात काम करणं अवघड झाल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप शिरसागर यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांनी संभाजीनगर मध्ये भाजपामध्ये अजित पवार यांची साथ सोडत भाजपाचा कमळ हाती घेतलं, उद्या नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे योगेश क्षीरसागर हे आता भाजपाच्या निशाणीवर बीड नगरपालिकेची निवडणूक लढताना पाहायला मिळतील यापूर्वी योगेश यांचे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची बीड नगरपालिकेवर गेल्या कित्येक वर्षात निर्विवाद सत्ता राहिलेली आहे.. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
पुण्यात पहाटे भीषण अपघात
पुण्यातील येरवडा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ वाहनाचा अपघात
हा अपघात रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या च्या सुमारास घडला
अपघातात नेमके किती जणं जखमी झाले आहेत हे समजू शकलेले नाही
एका भरधाव वेगात येणाऱ्या गाडीचा हा अपघात झाला
छत्तीसगडच्या सुकमामध्ये चकमक झाली आहे.
या चकमकीत 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी ठार झाले आहेत.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे.माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी असलेले भाजपाचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित दादाच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे.
यापूर्वी शरद पवारांनी लोहा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर काम केले आहे. आता लोहा नगरपालिकेचे निवडणूक लागलेली असताना शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात आहे तर लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या निष्काळजीपणाविरोधात थेट बंड पुकारल्याची घटना समोर आली आहे. वेळेवर शाळेत न येणाऱ्या आणि तास न घेणाऱ्या शिक्षकाविरोधात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सरांना वर्गातच कुलूपबंद केले.
या प्रकारानंतर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले आणि शिक्षक बदलण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शिक्षकाच्या सततच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळेच त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी हा तीव्र प्रकार केला. शाळा व्यवस्थापनाने घटनेची माहिती शिक्षण विभागाला दिली असून विभागाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे
धाराशिव शहरातील बार्शी नाका या वरदळीच्या चौकात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडलाय.हातात कोयता घेऊन एक तरुण चौकात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.तब्बल पंधरा मिनिटे तो रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना धमकावत कोयत्याचे वार करण्याचा प्रयत्न करत होता.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील विद्यार्थी, व्यावसायिक,नागरिक आणि प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.दरम्यान, माहिती मिळताच धाराशिव पोलिसांनी अतिशय धाडसाने आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
रायगडच्या अलिबागमधील मांडवा जेट्टी धोकादायक झाली आहे. हि जेट्टी म्हणजे रायगडला मुंबईसोबत जोडणारा महत्वपुर्ण जलमार्गाचा एक भाग आहे. मांडवा जेट्टीवर प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी असलेला जोड पूल आणि पाईल जेटी कमकुवत झाली आहे. पिलर्सचे काँक्रिट निखळून आतील लोखंडी शिगा बाहेर दिसत आहेत. जेट्टीच्या धोकादायक स्थितीमुळे प्रवाशी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करतोय, स्थानिक स्वराज निवडणूक अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो, आता आपण भाजप च्या कमळावर निवडणूक लढत आहोतयोगेश क्षीरसागर
मला टार्गेट वर्ग करतात,कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे,पण माझ्या ऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासला टार्गेट करावा,असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. गेल्या 9 वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास विरोधकांना करता आला नाही त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे आपण आणलेल्या विकास कामे देखील पूर्ण झाले नाहीत,त्यावर विरोधकांनी बोलायला हवं,असा आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केला आहे.ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीतील आणि ईश्वरपुर मधील सर्व विरोधक जयंत पाटलांच्या विरोधात एकवटले आहेत,त्यामुळे चुरशीने निवडणूक पार पडत आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.उरुण ईश्वरपूरनगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत.त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे.
नांदेड जिल्ह्यात 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गैरसमजल्या जाणाऱ्या लोहा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आह. नगराध्यक्षपदासह एकूण वीस जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मागच्या वेळेस या नगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. नगराध्यक्ष पद देखील भाजपाकडे होते. आताचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे तेव्हा भाजपाचे खासदार होते. परंतु आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि ते लोहा कंधार या विधानसभेचे आमदार झाले. त्यामुळे आता या मतदारसंघाचे राजकीय चित्र पूर्णता बदलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गड समजल्या जाणाऱ्या लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत आता त्यांना भाजपाचे तगडे आव्हान असणार आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी देखील लोहा, कंधार या नगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पूर्ण लक्ष असल्याने हे निवडणूक महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच होणार असं चित्र सध्यातरी निर्माण झालेल आहे.
नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याच्या धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तात्काळ परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
मनसेच्या बैठकीला सुरुवात
मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अभिजीत पानसे उपस्थित
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची बैठक
मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्ड ची चाचपणी मनसेकडून सुरु
कुडाळ-नेरुर दुर्गावाड येथे आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकरींवर हल्ला केला. यात दोन बकरींचा मृत्यू झाला. आजीम मुजावर यांच्या घराशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन बकरे लगेचच फस्त केले. अंधारातून अचानक हल्ला चढवणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये बिबट्याच्या दहशतीचं वातावरण पसरल्यानं रात्रीच्या वेळी फिरणे धोकादायक बनले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत खलील पटेल यांचे नाव घोषित केले असून ती आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील त्यांच्या नावाची घोषणा स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात दिसणार एकत्र
लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात झाली होती भेट
आज सोलापूर शहराचे माजी महापौर ऍड.यु.एन.बेरिया यांच्या 'सुवर्णपथ' या गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला असणार दोघांची हजेरी
या भेटी नंतर कांही तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला ही असणार दोघांची उपस्थिती
त्यामुळे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना देशातील दिग्गज नेत्यांची भेट होणार असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्षपदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. अलीकडेच भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी गटनेते विलास विखार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही तर दुसऱ्या गटाचा विखार यांच्या नावाला तीव्र विरोध आहे. विलास विखार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते. मात्र त्यांना भाजपात आणून आमदार बंटी भांगडिया यांनी मोठा धक्का दिला होता. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या आणि विजय वडेट्टीवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेत भाजपचा झेंडा रोवण्यासाठी आमदार भांगडीया विखार यांच्या नावासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे ब्रह्मपुरीचे भाजपचे माजी आमदार अतुल देशकर यांचा विखार यांच्या नावाला विरोध आहे, देशकर यांचा जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह आहे. यामुळे ब्रम्हपुरीत भाजपमध्ये मोठा कलह बघायला मिळू शकतो.
सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या - निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून,आत्तापर्यंत नगराध्यक्षपदासाठी ३१ उमेदवारांचे ५४ अर्ज दाखल झाले आहेत,तर नगरसेवकपदासाठी ६०० उमेदवारांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन ९३४ अर्ज आले आहेत.तीन नगरपालिकांतून नगराध्यक्षपदासाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही.आणखी दोन दिवस मुदत असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.प्रमुख पक्षांचे अद्याप स्वबळावर लढायचे की आघाडी करायची याबाबतचा निर्णय झालेला नाही.कालचा दिवस गेल्यानंतर आज रविवारी सुटीच्या दिवशीही अर्ज स्वीकारण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्यामुळे आता केवळ आज आणि उद्या असे दोन दिवस शिल्लक राहिल्याने आणखी किती अर्ज दाखल होणार हे लवकरच कळणार आहे.
राज ठाकरे यांनी मागच्या बैठकीत पुणे शहरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांवर व्यक्त केली होती नाराजी
बूथ लेव्हल एजंट यांनी केलेल्या मतदार यादीच्या कामाबाबत राज ठाकरे यांनी सांगितले होते काही बदल
दुरुस्ती करून पुन्हा मनसे चे पुणे शहरातील नेते हा अहवाल उद्या राज ठाकरे यांना सादर करण्याची शक्यता
भंडाऱ्यावरून तिरोडा दिशेने कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात भंडारा - तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथे घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे घडलेल्या अपघातानंतर तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. यामुळे पहाटे प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मोहाडी पोलिस, वाहतूक पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात मदत केली.
अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटानं नगराध्यक्षपदासाठी मंगेश गुंडाळ यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेत. दोन जागा समन्वयासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अपक्ष किरण आहेर आणि बापू थिगळे यांच्या एन्ट्रीमुळे स्पर्धा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहे मात्र या निवडणूकीत भाजप मागे पडताना दिसत असुन शिवसेनेचा शिंदे गट रणशिंग फुंकल्याने राजगुरुनगरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालीय.
आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसऱ्याचा पक्ष घेऊन बुडायचं हा ट्रेंड रायगडच्या राजकारणात एका कुटुंबाच्या माध्यमातून आला असल्याची टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता केली. आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यास तयार आहोत पण बदलत्या राजकारणात काही उलटफेर झालं तर त्यांनी आम्हाला दोष देऊ नये असा इशाराही आमदार दळवी यांनी दिला. ते पेण इथं बोलत होते. पेण नगर पालिका निवडणुकीत महायुती फिस्कटली असून शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्य व नगरसेवक पदासाठी निवडणूका जाहीर झाल्या असून,गेल्या सात वर्षा पुला खालून बरेच पाणी वाहून गेल्याने आणि पुन्हा अनेक वर्षांपासून तेच ते चेहरे यंदा पुन्हा नको,नविन चेह-यांना संधी मिळावी,शहराचा विकास कराचा असेल तर जुन्या अनुभवी नेत्यांना संधी मिळावी अशा प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्या असून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापु लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असुन 15 नोव्हेंबर रोजी अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.आत्तापर्यंत आठपैकी सात नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सुरूवातीचे दोन तीन दिवस अर्ज दाखल करण्याकडे इच्छुकांनी पाठ फिरवली होती त्यामूळे अर्जाचा ओघ कमी होता माञ 14 नोव्हेंबर पासून प्लो वाढला असुन धाराशिव सह सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली जात आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडलीय... राज्यातील राजकारणात आता नवीन पक्षाची एंट्री झालीय.... तो म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी (NPP). ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांनी या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षाची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर केली.
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांकडे आपलं लग्न जुळऊन देण्यासंदर्भात पत्र दिले होते.. त्याची बातमी पुढारी न्युजने दाखवताच बुलढाण्यातील मानस फाउंडेशनने सदर तरुणाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे.. मानस फाउंडेशन अनेक वर्षापासून विधवा, परितक्ता, एकल महिलांच्या पुनर्विवाह आणि रोजगारा संदर्भात चळवळ राबवत आहे, आणि या तरुणांसोबत मानस फाउंडेशनने संपर्क केला असून येत्या दोन दिवसांमध्ये त्याच्या घरी जाऊन त्याला योग्य ते स्थळ सुचवले जाणार आहे.. आणि त्याच्या लग्नापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी मानस फाउंडेशन पुढाकार घेणार आहे...
ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी चे नेते योगेश क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे बीड नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी हस्तक्षेप करत स्वतः पॅनल उभा करून सर्व सूत्रे यांच्या हाती घेतल्याने योगेश क्षीरसागर नाराज झाले असल्याची माहिती समोर आली आहे त्या स्वतः पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत
परभणी शहरासह जिल्ह्याचे तापमान अत्यंत घसरल्यामुळे मागच्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये थंडीच्या कडाका कायम आहे काल जिल्ह्याचे तापमान 7.9° चे तेवढे होते तर हेच तापमान आज 8.5 एवढे झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये कुठे भेटायला लागलेले आहेत सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी नागरिक विद्यार्थी दूधवाले उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या चार नगरपरिषदा आणि गुहागर, लांजा, देवरुख या तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहाव्या दिवशी सदस्यांच्या जागेसाठी ९३ आणि थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी ५ अर्ज असे एकूण ९८ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सदस्याच्या जागेसाठी १११ आणि थेट नगराध्यक्षाच्या जागेसाठी १० अर्ज आले आहेत. रत्नागिरीत मात्र, नगराध्यक्षाच्या जागेसाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही..
रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महायुतीमधून नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून ९, भारतीय जनता पक्षाकडून ६ अर्ज भरण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाकडून २ अर्ज आणि अपक्ष २ अर्ज दाखल झाले आहेत. चिपळुणात नगराध्यक्ष पदासाठी ३ आणि नगरसेवक पदासाठी २६ अर्ज दाखल झाले. खेड नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ उमेदवारी अर्ज आणि भाजपकडून २ अर्ज दाखल झाले आहेत.
सांगलीतील उत्तम मोहिते खून प्रकरणी सांगली पोलिसांकडून संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. शहरातल्या इंदिरानगर,गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी गणेश मोरे सह टोळीची धिंड काढत,दहशत मोडून काढली आहे.3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण पणे खून करण्यात आला होता.खुनाच्या घटने दरम्यान संशयित हल्लेखोर पैकी एकाचा मृत्यू देखील झाला होता.या दुहेरी खुणाच्या घटनेमुळे सांगली हादरून गेली होती.या खून प्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह चौघांना अटक करण्यात आली होती,या टोळीचे असणारी परिसरातील दहशत म्हणून काढण्यासाठी, उत्तम मोहितेंचा खून झाला,परिसरामध्ये मोरे टोळीची धिंड काढण्यात आली.
जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घालून शेतकऱ्यांच्या शेती पिकांना प्रचंड तडाखा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागच्या पंधरा दिवसापूर्वी अनेक ठिकाणी कपाशीची बोंडे चढली तर कापसाच्या वाती झाल्या. मात्र आता शेतातच फुटलेल्या कापसाला वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने जालना जिल्ह्यातल्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतात शेतकऱ्यांचे पांढरं सोनं अजूनही पडूनच आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर
वसंतराव नाईक पुतळा अनावरण आणि भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाचे करणार उद्घाटन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा संभाजीनगरचा महत्त्वाचा दौरा
काही नेत्यांचा प्रवेश सोहळा आज होणार होता मात्र प्रदेशाध्यक्षना दिल्लीला जावं लागलं असल्याने प्रवेश सोहळा रद्द
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री साधतील संवाद
यवतमाळ जिल्ह्यात सकाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात धक्के पडल्याने राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांना हेडलाईट लावून हळूहळू रस्ता शोधावा लागत होता. काही ठिकाणी तर एवढे धुके दाटले की संपूर्ण परिसर धुक्याच्या भिंतीने वेढल्यासारखा भासत होता.
अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...
कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...
काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाची कारवाई...
गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ...
एकाच आठवड्यात घेतले दोन बळी...
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू...
वन विभागाकडून सुरू होता नरभक्षक बिबट्याचा शोध...
अखेर सहा दिवसांनंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...
सीआयएससीई च्या वतीने घेण्यात येणाऱ्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
सीआयएससीईच्या वेळापत्रकानुसार आयसीएसई’ची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ३० मार्च
आयएससी’ची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ६ एप्रिल दरम्यान होणार
यंदाच्या ‘आयसीएसई’ची परीक्षा सुमारे दोन लाख ६० हजारांहून अधिक, तर ‘आयएससी’ची परीक्षा सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी
आयसीएसई’च्या ७५ विषयांची आणि आयएससी’च्या ५० विषयांची परीक्षा होणार
‘सीआयएससीई’च्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक ‘https://cisce.org/’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
पुणे जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील पन्नास विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी मिळाली. बालदिना निमित्ताने राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात हे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना विचारले, तुम्हाला भविष्यामध्ये काय बनायचे आहे? कुणी सांगितले डॉक्टर, वैमानिक, लष्कार, पोलिसमध्ये जाणार असल्याची उत्तरे दिली. पण, राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित असलेल्या भोरमधील आपटी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सोहम पारठे या सहावीतील विद्यार्थ्याने ‘‘मला राष्ट्रपती व्हायचंय,’’ असे उत्तर दिले. या उत्तराने चकित झालेल्या मुर्मू यांनी ‘‘तू भविष्यात नक्की राष्ट्रपती होशील, पण त्यावेळी तुझ्यासोबत मला फोटो घेण्याची संधी मिळेल की नाही, हे माहिती नाही. म्हणून मी तुझ्यासोबत आजच फोटो घेते.’’ असे म्हणत त्यांनी सोहमसोबत आपुलकीने फोटो घेतला आणि तो एक्सवर पोस्टही केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.