- वंचित २४ प्रभागांत स्वतंत्र लढणार.
- महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे ३६ जागांचा प्रस्ताव ठेवला.
- काँग्रेसच्या शहर नेतृत्वाने तुमचे अस्तित्व कुठाय? असे म्हणून हेटाळणी केली. केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शविली.
- मुंबई महापालिकेत आघाडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, नागपुरात काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वाने वंचित पुढे चार जागेचा प्रस्ताव ठेवल्याने वंचित असमर्थन दाखवत एकला चलोरेचा नारा दिला.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक अपडेट
शिवसेना भाजप नवी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवणार
शिवसेना-भाजप युतीचा फॉर्मुला जुळला नसल्यामुळे दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात आले आहे
त्यामुळे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा सामना नवी मुंबईच्या राजकारणात रंगणार आहेत
- कॉंग्रेसकडून उबाठाला सन्मानजनक जागा मिळत नसल्याने नाराज...
- जागा वाटपावरून काँग्रेस उबाठा मध्ये रस्सीखेच सुरू आहे, 4 ते 5 जागांसाठी आघाडी तुटण्याची शक्यता
- आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास उबाठा नागपूरात स्वबळावर लढणार
- काँग्रेसने जागा वाटपात चर्चेत व्यस्त ठेवल्याचा उबाठाचा आरोप.
- राष्ट्रवादीला 12 जागा मिळत असल्याने समाधानी नाही, त्यामुळे वेगळा पर्याय निवडण्याच्या तयारीत, स्वबळावर लढण्याचा निर्धार...
- दोन्ही पक्ष बाहेर पडल्यास कॉंग्रेसही स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही...
माजी महापौर विकास जैन नाराज
शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त राहिलेले नाही
मी निवडणूक लढवणार नाही
पालकमंत्री असताना त्यांच्या घरावर टार्गेट करणं त्यांच्या मुलांना टार्गेट करणार हे योग्य नाही
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन स्थळे यंदाही पर्यटकांची पहिली पसंती ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा व खंडाळ्यातील विविध पर्यटन स्थळांवर दाखल होत आहेत. त्यामुळे या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट, राजमाची पॉइंट, कार्ला–भाजे लेणी तसेच खंडाळ्यातील ड्यूक्स नोज, अमृतांजन पॉइंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. थंडगार हवामान, निसर्गसौंदर्य आणि मुंबई–पुण्याच्या जवळीकतेमुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे...
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला धक्का..
युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी दिला राजीनामा..
पक्षांमध्ये सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याचा केला आरोप..
पक्षाची विचारधारा बदलली असून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने विना राजीनामा..
लवकरच शिंदे सेनेमध्ये करणार प्रवेश..
शिवसेना शिंदे सेना पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती चोखपणे पार पाडणार..
पुण्यात अजित पवार सुसाट
काल दुपारपासून रात्रीपर्यंत १० जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात केला प्रवेश
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काल एका दिवसात सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह अनेक स्थानिक नेत्यांचा प्रवेश
अजित पवारांनी वेळ साधली
आजही काही प्रवेश होण्याची शक्यता
भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट ,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून १० जणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे शहरातील या मुख्य १० जणांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
धनंजय जाधव भाजप
जयराज लांडगे मनसे
दत्ता बहिरट : काँग्रेस
शंकर पवार : भाजप
मुकारी अलगुडे : भाजप
नीता मांजळकर : शिवसेना ( ठाकरे )
आनंद मांजळकर ( शिवसेना )
स्वप्निल दुधाने (राष्ट्रवादी श प)
मधुकर मुसळे (भाजप)
प्रकाश ढोरे ( मनसे)
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास काही तास शिल्लक राहिलेले असताना महाविकास आघाडीतील सुरू असलेल्या जागा वाटपातील तिढा आज सुटून युतीची घोषणा आज होणार का याकडे धुळ्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे,
काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाला 74 पैकी काँग्रेस 30 ठाकरेसेना 30 तर राष्ट्रवादी 14 असा प्रस्ताव मान्य नसून 25-25-24 हा फॉर्मुला करण्यात आला तरच आघाडी होईल, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भूमिका असून, जागा वाटपाचा तिढा हा काँग्रेस तर्फे सोडविण्यात येणार का आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडी म्हणून आघाडीत निवडणूक लढणार का हे बघणं औचित्याच ठरणार आहे.
शरद पवारांचे राष्ट्रवादी 40 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार देणार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी 125 शरद पवारांची 40 जागा लढणार
पॅनल निवडून येण्यास सोपे जाण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक उमेदवार प्रत्येक प्रभागात असणार
राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीची रणनीती
भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक पाठोपाठ मालेगाव महापालिका निवडणुकीत सेना-भाजप यांची युती तुटली आहे,काल रात्री उशिरा गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत भाजपात प्रवेश केलेल्या बंडू बच्छाव,अदवय हिरे यांचा प्रमुख्यने युतीला विरोध असल्याने अखेर मालेगाव महापालिकेत युती होऊ न शकल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवणुका लढवणार असल्याचे सुत्रनी माहिती दिली आहे
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार
40 जागांवर राष्ट्रवादी तुतारी लढणार
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे विशाल तांबे व इतर पदाधिकारी जागावाटप संदर्भात निर्णय घेताय
अजित पवार 125 जागांवरती निवडणूक लढणार
शरद पवार 40 जागा मित्र पक्षाला अजित पवार यांच्याकडून काही जागा ठेवण्यात आल्या आहेत
डायलिसिस केंद्राला शाॅर्टसर्किट,कर्मचाऱ्यांनी खिडकी फोडून आठ रुग्णांचे प्राण वाचविले
यवतमाळच्या उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना,रुग्णालयातील मोफत डायलिसिस सेवा केंद्रात शाॅर्टसर्किटमुळे धुराचे लोळ पसरल्याने उडाली खळबळ
या घटनेने रूग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांनी फायर सिलिंडरने शाॅर्टसर्किटवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला
घटने दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रूग्णांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढले,या घटने दरम्यान कोणतीही जिवितहानी अथवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही,शाॅर्टसर्किटमुळे डायलिसिस केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार
यापूर्वी काँग्रेसने पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली मात्र आता काँग्रेस तिसरी यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्म देणार
आणखी नव्या 12 उमेदवारांना मिळणार संधी
81 जागांपैकी काँग्रेस 69 जागांवर तर शिवसेना 11 जागांवर लढवणार निवडणूक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री उदय सामंत यांना पाठवलं पुण्याला
शिवसेनेचे नेते अजित पवारांना भेटले, त्यानंतर रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन स्वबळाचा नारा देण्यासाठी विजय शिवतारे 12 वाजता पत्रकार परिषद घेणार होते
मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील नेत्यांना निरोप....उदय सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार...
पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही...
दहा वाजता होणार उदय सामंत आणि पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक...
मंत्री उदय सामंत घेणार अंतिम निर्णय....
जालन्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज आज शेवटचा दिवस असून अद्यापही जालन्यामध्ये युती आणि आघाडी बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे तर दुसरीकडे जालन्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे तर वंचित बहुजन आघाडी देखील स्वबळावर ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास सात मॅरेथॉन बैठका होऊन देखील अद्यापही युतीबाबत निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे जालन्यामध्ये युती होणार का आघाडी होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे...
शिवसेनेकडून 40 च्या वर एबी फॉर्म वाटप
25 जागांवरती महायुती झाली तर शिवसेना लढू शकते
सामंत भाजप नेत्यांची चर्चा करणार
त्यामुळे शिवसेना महायुतीत जर गेली तर 25 ते 30 जागांवरती लढू शकते आणि वेगळी लढली तर 40 जागांवर ते शिवसेना उमेदवार उभे करणार
रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारला. ढोल-ताशांच्या गजरात नूतन नगराध्यक्ष सुर्वे यांनी नगरपरिषदेमध्ये प्रवेश केला. नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीचा आलेख चढता ठेवण्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज हे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच नागरिकांचे प्रश्न, सुविधा आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचे आश्वासन रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिले.
आम आदमी पक्षाने घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. आम आदमी पक्षाने पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही पक्षाशी युती न करता जवळपास सर्व 128 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.
तसेच आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी स्वतः प्रभाग क्रमांक 26 मधून आपला महापालिका निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत रविराज काळे यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला आहे.
आम आदमी पक्षासाठी आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची मत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दिल्लीच्या धरतीवर नागरिकांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, 20 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन अशी आश्वासन आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी या निवडणुकीत दिली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही धनशक्ती विरोधात जनशक्ती असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा निश्चितच विजय होईल तसेच महापालिकेवर आम आदमी पक्षाचाच महापौर बसेल असा विश्वास आम आणि पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकी मधील युतीचा तिढा अखेर सुटला आहे.131 जागांपैकी शिवसेनेला 87 जागा तर मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला 40 जागा देण्यात आल्या आहेत.तर मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी सेनेच्या अधिकृत उमेदवारांना अर्जाचे वाटप करण्यात आले. तर भाजपच्या वतीने देखील वर्तक नगर येथील कार्यालयात अर्जाचे वाटप करण्यात आले.आज सकाळी पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहेत.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पूर्णत्वास येत आहे. आघाडीतील पक्षांना खालीलप्रमाणे जागा देण्याबाबत एकमत झाले आहे.महाविकास आघाडी अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाला ३३ जागा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १९ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना ७ जागा देण्यात येणार आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाला १२ जागा, मनसेला २ जागा, समाजवादी पार्टीला १ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे.
अकोल्यातून मोठी बातमी.. अकोल्यात महायुती फिस्कटली आहेये.. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत युतीची घोषणा केलीय...तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय... महायुतीमधील जागावाटप फिस्कटल्याने अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.. काल रात्री उशिरापर्यत मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक पार पडली.. या बैठकीत शिवसेनेने हा 'ऐकला चलो रे'चा नारा दिलाय... त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणूकीत भाजप अन अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणारेये... तर शिवसेना पक्ष 80 जागांवर आपले उमेदवार देणारेये, अशी घोषणा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केलीए.. मात्र, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोजके काही तास राहिले, अशातही मंत्री संजय राठोड यांनी महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलेये.
अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय.. काही जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा होता. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या चेर्चेतून अखेर तिढा सुटलाये. भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा केलीय.. 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवार देणारेये.. काही जागांवर भाजप मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याचे चित्र आहेये.. मात्र, शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिलाय
भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती अकोल्यात जाहीर झाली खरी, मात्र ही युती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले.. आणि भाजपसोबत युती का केली?, याची भूमिका मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेच्या नेत्यांना समजावून सांगितली. अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत न घेतल्यामुळे शिंदे सेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ आलीय.. मूर्तिजापूर रोडवरच्या शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असलेल्या आरजी हॉटेलमध्ये इंद्रनील नाईक आणि मिटकरी यांनी मंत्री संजय राठोड आणि सेनेच्या नेत्यांची भेट घेतलीय. युती न झाल्यामुळे दुरावा नको म्हणून भेट घेतल्याचं मंत्री इंद्रनील नाईकांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, अकोल्यात भाजप 80 पैकी 66 जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवर लढणारेये.
महापालिकेच्या तोंडावर लातूर शहरात काँग्रेसला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळाल, माजी महापौर यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला , त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा ही, खऱ्या अर्थाने पणाला लागली आहे ,मात्र लातूरची संस्कृती ही, वेगळी आहे., इथे विकासाला आणि गुणवत्तेला मत दिलं जातं ,बंडखोरीला नाही. एखादा पक्ष बदलल्यानंतर राज्यात आणि देशात काय घडत ते आपण पाहतो. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला तरी लातूरची जनता ही विकासाच्या आणि गुणवत्तेच्या पाठीमागे उभी राहते. लातूरने जेव्हा-जेंव्हा लोकप्रतिनिधी निवडले तेंव्हा त्यांनी कधीही कर्तव्यात कसूर ठेवली नाही, हे लातूरच वेगळं वैशिष्ट्य असल्याच आ अमित देशमुख त्यांनी एका भाषणादरम्यान सांगितलं, तर त्यांच्या या भाषणामुळे गळती लागलेल्या काँग्रेसला लातूर मध्ये सहानुभूतीची चर्चा होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.