अमरावतीच्या इर्विन चौकातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा हा गणपती संपूर्ण विदर्भाचे आकर्षण ठरत आहे.मुंबईच्या लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेल्या या विदर्भाच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक रोज रांगा लावत असतात.या मंडळाला 48 वर्षे पूर्ण होत आहे... या विदर्भ राजाची विसर्जन मिरवणूक ही संपूर्ण विदर्भात अतिशय आकर्षक व पाहण्यासारखी असते. जिल्ह्यातील सर्व गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पाच दिवसानंतर या विदर्भाच्या विसर्जन केलं जातं. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील जे नागरिक बाहेर राहतात ते देखील या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आवर्जून येत असतात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांत तब्बल २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक भागांत पिके वाळण्यास सुरुवात झाली असून सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळताच पंचनामे सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्यात यंदा ६.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी १.१८ लाख हेक्टरवरील पिके वाळल्याची माहिती आहे. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या १९ टक्के क्षेत्राला पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, मका यासह खरीप पिकांना सध्या पावसाची गरज असताना अनेक महसूल मंडळांत सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ पुरेसा पाऊस झालेला नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच वाळत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता आहे. नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर वाळलेल्या पिकांचे क्षेत्र आणि नुकसानीची तीव्रता स्पष्ट होणार आहे.
- बुटीबोरीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग, जाम वेळीच लक्षात आल्यान जीवित हानी नाही, मात्र बस जळून खाक, बसमध्ये असलेले 35 प्रवासी सुखरूप
- चंद्रपूर-बुटीबोरी मार्गावरील बोरखेडी रेल्वे परिसरातील घटना, घटनेनंतर वाहतुकीचा झाला होता खोळंबा..
राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते दिवसभर मालेगाव,वाशिम, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील गावांना भेट देऊन पिक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
यात दुपारी २ वाजता झोडगा, ता. मालेगाव, दुपारी २.३० वाजता सुपखेला, ता. वाशिम , दुपारी ३ वाजता वरुड बुद्रुक, ता. मंगरूळपीर
त्यानंतर सायंकाळी ३.४५ वाजता कुपटा, ता. मानोरा आणि सायंकाळी ४.३० वाजता खेरडा, ता. कारंजा (लाड) येथे पिक परिस्थितीची पाहणी करून सायंकाळी ५ वाजता कारंजा (लाड) येथून अकोला
देशभरातील विविध आगीच्या दुर्घटना तसेच अलिकडेच दिल्ली, मुंबई, अमरावती याठिकाणी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टिने रुग्णालये, पीजी, क्लासेस यांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांना देताच अग्निसुरक्षाविषयक पाहणी सुरु केली आहे. या आदेशानुसार अग्निशमन प्रमुखांनी पीजी होस्टेल अग्निसुरक्षाविषयक यंञणेची पाहणी करण्यास सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीनिमित्त यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. तर, ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, ज्येष्ठ नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सातासमुद्रापार टेक्सासच्या भूमीत ढोल-ताशांचा गजर, टाळमृदंगाची साथ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या ‘मानाचा पहिला- श्री कसबा गणपती’ची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा पार पडला असून, अमेरिकेत दहा दिवसांसाठी कसबा गणपतीची प्रतिकृती विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आश्वासित केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात अॅड. शेलार बोलत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.