आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजाननाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे. राज्यभरातून हजारो भाविक शेगावात दाखल झाले असून अक्षय तृतीयेनिमित्त संत गजानन महाराज चरणी लिन होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने शेगावात दाखल झाले आहेत.
65 वर्ष वय असलेल्या किशोर वासनिक यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय..
अमरावती चे तापमान काल 44 अंशाच्या वर गेल होत.
या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असताना हा मृतदेह दिसून आला.
परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस दाखल.
बारामती - उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आज सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या असता त्यांना अनेक बारामतीकर भेटले. त्यांनी नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात
स्टील भरलेल्या एका ट्रकने इतर वाहनाना ठोकर देऊन रस्त्यानजिकच्या विहिरीत कोसळला
सदर ट्रकचा चालक हा ट्रकच्या खाली असण्याची शक्यता आहे.
आज पहाटे घडला अपघात
ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी
महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे, बंदोबस्त मात्र महामार्गावर तौनात
बुलढाणा जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान 40 डिग्री पासून 42,43 डिग्री चे वर पोहचले आहे. . मागील महिन्यात तापमान हे 38 डिग्री पर्यंत गेले होते, मात्र एप्रिल महिन्यातच तापमानाची तीव्रता वाढली आहे . नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होताना दिसत आहे .. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने आपल्या अधिनस्त असणाऱ्या सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघाता कक्षाची स्थापना केलीय .. सुसज्ज असे हे कक्ष स्थापना करण्यात आले असून एका पथक सुद्धा प्रत्येक कक्षात तयार ठेवले आहे .. तर नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्याने आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे
धाराशिव मधील नगरपरिषदेच्या छञपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.याबाबत गेली अनेक वर्षापासून अखील भारतीय नाट्य परिषदेकडून मागणी केली जात होती अखेर या बाबत शासन निर्णय निघाल्यानंतर धाराशिव मधील छञपती शिवाजी महाराज चौकात अखील भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करत लाडु वाटत जल्लोष केला.
- महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात आज SIT पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करणार
- दरम्यान मोबाईल उघडल्यानंतर भोंदू खरातचे अनेक ‘डर्टी सिक्रेट्स’ समोर येण्याची शक्यता
- पुरावे नष्ट करण्यासाठी खरातने डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक टीमकडून रिकव्हर, सूत्रांची माहिती
- खरातने डिलीट केलेले चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती
- भोंदू खरात कोणाच्या संपर्कात होता? आर्थिक व्यवहारांचे पुरावे, मनी लाँड्रिंगचे कोड नंबर याचा उलगडा होणार
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारी पूर्वीच एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत ५५५ मेट्रिक टन खतांच वितरण झाल्याने कृषि विभाग खडबडून जागा झाला,त्या पार्श्वभूमीवर जादा प्रमाणात खते विक्री केल्या प्रकरणी दोषी 13 कृषी केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली होती... या सुनावणी दरम्यान 8 कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून,4 कृषी केंद्राना ताकीद देण्यात आली. तर एका कृषी केंद्राची पुनरचौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा…
अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखविण्यात आला. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.
आरोपी अयान अहमद वर गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 दिवसांतच त्याचे इंस्टाग्रामवर वाढले 4 हजार फॉलोअर्स.. आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज "ट्रेडिंगवर"...
गुन्हा दाखल होण्यापूर्वी होते 18 हजार फॉलोअर्स आता झाले 22 हजार झाले फॉलोअर्स..पोलीस तपासात माहिती उघड..
मागील सहा दिवसात अनेकांनी अयानचे इंस्टाग्राम पेज सर्च केल्याची माहिती...
आरोपी अयान अहमद हा सोशल मीडियावर सक्रिय असून तो इंस्टाग्राम वर अनेक ब्लॉग बनवत असल्याच समोर.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तहसील कार्यालया मार्फत श्रावण बाळ वृध्द योजना,संजय गांधी निराधार योजना लाभ सुरू ठेवण्यासाठी ह्यात प्रमाणपञ सादर केल्यावर अपेरिक्षातुन ढाकेफळ गावाकडे परतीच्या प्रवासात निघालेल्या वृध्द लाभार्थीची भरधाव रिक्षाचा ७४ जळगाव ते बोरगांव रोडवर अपघात होऊन ९ जण जखमी झाले. ढाकेफळ येथील काही वृध्द लाभार्थी सकाळी पैठण तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी गेल्यावर तिथे एका मध्यस्त दलाला मार्फत ऑनलाइन व ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वजण ढाकेफळ गावाकडे अपेरिक्षा क्रमांक (एम.एच.-२०-एस-०४८६) मधुन परतीच्या प्रवासात निघालेल्या रिक्षाचे टाकळी,बोरगाव ७४ जळगाव रोडवर एका ठिकाणी भरधाव रिक्षाचे चाकातील बेरींग खराब होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रोडखाली एका खड्ड्यात पलटी झाली.असता शेतातील मंजूर, इतरांनी तात्काळ मदत कार्य करून जखमींना बाहेर काढून ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेतून सर्व ९ जखमींना बिडकीन शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी मध्ये मारोती संपत शिरसाठ (८०), हौसाबाई विश्वनाथ शिंदे (७०), सरसाबाई काशिनाथ दळे (६७), केसरबाई अर्जुन मोरे (८०), द्रोपदाबाई देविदास कोल्हे (७५), सरसाबाई जनार्धन कोल्हे (७५), हौसाबाई मुरलीधर गोन्टे (७८), द्वारकामाई मारोती शिरसाट (७१) राजू यादव मोरे (३०) यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा खाजगी दौरा असणार आहे. रायगडच्या तळा तालूक्यातील बोरीचा माळ येथे पुरातन श्री देवी लक्ष्मी मातेच्या मंदिराचा जिर्णोध्दार कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे रायगडमध्ये येत आहेत. बोरीचा माळ हे गाव शिंदेसेनेचे आमदार तुकाराम काते यांचे मुळ गाव असून काते यांच्या खास आग्रहास्तव शिंदे बोरीचा माळ येथे येत आहेत. गावच्या विकासासाठी ग्रामस्थ यावेळी शिंदे यांना निवेदन सादर करणार आहेत.
राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.
नवी मुंबई शहरामध्ये अनाधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात सिडकोणी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे घणसोली या परिसरामध्ये अनाधिकृत मोठ्या प्रमाणात इमारती उभा केल्या जात आहेत त्यामुळे बांधकाम अनाधिकृत तोडण्याचं काम युद्धपातळीवर सिडकोणी सुरू केले त्यामुळे धडक कारवाई सिडकोणी सुरू केली आहे
मावळात सध्या निसर्गाने जणू पिवळ्या सोन्याची उधळणच केली आहे… बहाव्याच्या सोनसळी फुलांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. कडक उन्हाच्या झळा सहन करत असतानाच रस्त्याच्या कडेला फुललेला बहावा निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालत आहे. एप्रिल-मे महिन्यात बहरणारा बहावा हा पिवळ्याधम्मक फुलांनी सजलेला देखणा वृक्ष… पानगळ झाल्यानंतर संपूर्ण झाडावर लोंबत्या पिवळ्या झुंबरांची चादर पसरते आणि परिसराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं. म्हणूनच याला इंग्रजीत ‘गोल्डन शॉवर ट्री’ म्हटलं जातं. विशेष म्हणजे, बहावा बहरला की साधारण ६० दिवसांत पावसाची चाहूल लागते, अशी आख्यायिका सांगितली जाते… त्यामुळेच बहावा ‘निसर्ग दर्शक’ म्हणूनही ओळखला जातो
यवतमाळच्या राळेगाव शहरात अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात विकणे,देह व्यापारासाठी वापरणे तसेच मानव तस्करीसारखा अतिशय गंभीर प्रकार असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी केला आहे.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण तसेच तालुका व शहर पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.