मयत शंकर गणपत लोणबले संजय राठोड
महाराष्ट्र

वरझडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन महिला जखमी

सध्या शेतीची मशागत सुरू असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरझडी येथील 37 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्याची घटना दि 7 जुलै ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. शंकर गणपत लोणबले (40) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो वरझडी( बंडा) येथील रहिवाशी असून त्याचे याच गावात शेत आहे.

सध्या शेतीची मशागत सुरू असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दि 7 जुलै ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटा सह वरझडी परिसरात पावसाला सुरुवात झाली शंकर आपल्या शेतात काम करीत होता. पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करणाऱ्या दोन महिला शेतात असलेल्या झोपडीत आसरा घेतला तर शंकर झोपडी लगतच असलेल्या झाडा खाली उभा असतांना त्याच्या अंगावर वीज कोसळली तर झोपडीत महिलांना याचा जोरदार झटका लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

वीज पडल्याची माहिती लगत शेतात काम करीत असलेल्या काही मजुरांना कळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली त्या तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टराणी शंकरला मृत घोषित केले तर जखमी दोन्ही महिलांना पुढील उपचारा करिता चंद्रपूर येथे हलवलीण्यात आले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT