Aurangabad News
Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

निसर्गाचा निर्दयीपणा! वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - पावसाळा सुरू होताच औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात पावसासोबतच विजांचा तांडव पाहायला मिळत आहे. शनिवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात एक महिला गंभीर जखमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पाऊस येत असल्यानं झाडाखाली थांबलेल्या दोन तरुणांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पाहा -

रोहनसिंग शिंदे आणि रवि कळसकर अशी त्यांची नावे आहेत. रोहनसिंग आणि रवी हे दोघे मित्र होते. तर दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील रोजवेपूर शिवारात वीज पडून एक म्हैस ठार झाली तर आणखी एका घटनेत बेलखेडा तांब्यात वीज पडून सात शेतमजूर जखमी झाले. बेलखेडा इथं शेतात काम करीत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस आला. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर जवळील लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले असता, जोरात विजेचा कडकडाट होऊन वीज झाडाला स्पर्श करून पुढे गेली.

यात विमलबाई राठोड, गीताबाई राठोड, कविता राठोड, सरलाबाई राठोड, सरलाबाई युवराज चव्हाण, शालिनी पवार, राजेंद्र पवार जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करणयात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात एक जण गंभीर जखमी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

Mumbai Local Train: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकल ट्रेनचा डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

SSC Result HSC Result Date News: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी Update समोर!

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT