Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

निसर्गाचा निर्दयीपणा! वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पाऊस येत असल्यानं झाडाखाली थांबलेल्या दोन तरुणांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - पावसाळा सुरू होताच औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात पावसासोबतच विजांचा तांडव पाहायला मिळत आहे. शनिवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात एक महिला गंभीर जखमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पाऊस येत असल्यानं झाडाखाली थांबलेल्या दोन तरुणांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पाहा -

रोहनसिंग शिंदे आणि रवि कळसकर अशी त्यांची नावे आहेत. रोहनसिंग आणि रवी हे दोघे मित्र होते. तर दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील रोजवेपूर शिवारात वीज पडून एक म्हैस ठार झाली तर आणखी एका घटनेत बेलखेडा तांब्यात वीज पडून सात शेतमजूर जखमी झाले. बेलखेडा इथं शेतात काम करीत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस आला. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर जवळील लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले असता, जोरात विजेचा कडकडाट होऊन वीज झाडाला स्पर्श करून पुढे गेली.

यात विमलबाई राठोड, गीताबाई राठोड, कविता राठोड, सरलाबाई राठोड, सरलाबाई युवराज चव्हाण, शालिनी पवार, राजेंद्र पवार जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करणयात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात एक जण गंभीर जखमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT