महाराष्ट्र

बारावीत कमी गुण मिळाल्याने बार्शीत विद्यार्थिनीची आत्महत्या

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बार्शीत एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सृष्टी बोंदर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोरा गावची रहिवासी आहे.

सृष्टी बारावीच शिक्षण घेण्यासाठी बार्शीतील (Barshi) ब्रम्हचैतन्य नगरमध्ये भाड्याची खोली घेऊन राहत होती. राज्य मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल अवघ्या दोन्ही दिवसांपूर्वीच म्हणजे बुधवारी ८ जून रोजी जाहीर झाला.

हे देखील पाहा -

मात्र, बारावीमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने सृष्टीने भाड्याच्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ८५ ते ९० % ची अपेक्षा असणाऱ्या सृष्टीला ६५% मिळाल्याने नैराश्यतून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वातर हळहळ व्यक्त केली जातं आहे. दरम्यान, सृष्टीच्या आत्महत्येबाबतचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT