Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : 'काँग्रेस असो की भाजप, गेले ते दिवस...', जाहीरनाम्यावरून बच्चू कडूंनी सूनावलं

Lok Sabha Election 2024 : आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजप जाहीरनाम्यानुसार वागत नाही. त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काहीही अर्थ उरलेला नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

Sandeep Gawade

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा जाहीरनामा नव्हे तर खंजरनामा अशी टीका केली होती. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजप जाहीरनाम्यानुसार वागत नाही. त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काहीही अर्थ उरलेला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपने सुद्धा 2014 च्या निवडणुकीत 50 टक्के नफा काढून भाव काढवू असं आश्वासन दिलं होतं. 2019 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू, असे जाहीरनाम्यात घोषित केलं होतं, मात्र भाजपने देखील जाहीरनाम्यानुसार आपले वचन पूर्ण केलेलं नाही. जाहीरनामा वाचू मतदार देखील मतदान करत नाहीत. आधी वचननामा जाहीरनाम्याला महत्त्व होतं, मात्र तो काळ गेला अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Pitru Paksha 2025: श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

Maharashtra Live News Update: माफी मागायचा काय विषय येत नाही, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पडळकर ठाम

Ajit Pawar : '...नाहीतर खुर्ची खाली करा' अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे? Video

SCROLL FOR NEXT