लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री शहा यांनी मतमोजणीआधी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून धमकावले, असा दावा त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्याकडून आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी केलेल्या आरोपांचा पुरावा मागितला आहे, जेणेकरून कारवाई करता येईल. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर अमित शहा यांनी देशभरातील 150 जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना फोन केल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे.
दरम्यान, आयोगाच्या नोटिशीवर रमेश यांनी एका आठवड्याची अतिरिक्त मुदत मागितली होती, ती आयोगाने नाकारली आणि आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. रमेश यांना लिहिलेल्या पत्रात आयोगाने त्यांना ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा निवडणूक आयोग त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल, असं म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.