Prithviraj Chavan Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीबाबत राज्याचे माझी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Satish Kengar

Prithviraj Chavan On BJP:

लोकसभा निवडणुकीबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपला बहुमताचा 272 चा आकडा गाठणं अवघड आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार गटावर भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार गटाच्या एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा निवडून येऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. साम टीव्हीशी संवाद साधताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ''महाविकास आघाडीच्या चांगल्या जागा निवडून येतील. तिन्ही पक्षाचे मिळून एकूण 32 किंवा त्यापेक्षा जास्त जागा निवडून येतील, असं मी आता भाकीत करत आहे.''

भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर चव्हाण म्हणाले, ''400 पार ही फक्त घोषणा आहे. विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर, भारतीय जनता पक्ष नेहमीच वाढून आकडा सांगता आला आहे. यात त्यांनी 200 पार, 300 पारच्या घोषणा दिल्या, मात्र प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी जागा त्यांच्या निवडून आल्या. ''

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, ''ही निवडणूक पूर्ण वेगळी झाली आहे. त्यांना देशात 272 जागा मिळणार नाही. त्यांना 370 जागा संविधान बदलायला हव्यात का? अशीही चर्चा आहे. मुस्लिम, दलित यांना संविधान बदलायची भिती वाटते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT