भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला एक वेगळं महत्त्व दिलं जातं. लग्न केवळ दोन व्यक्तींचं नसून त्यामुळे संपूर्ण दोन कुटुंब एकत्र येतात असं मानलं जातं. दरम्यान लग्नानंतर अनेक बदल होतात. मात्र तुम्हाला माहितीये लग्नानंतर होणारे हे बदल म्हणजे केवळ मानसिक बदल नसतात. तर काही प्रमाणात शारीरिक बदल देखील होत असतात.
जेव्हा जोडपं आई-बाबा होतं तेव्हा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्णपणे बदलतो. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर मुलींमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल सांगणार आहोत, जे कदाचितच तुम्हाला माहिती नसतील. हे बदल महिलांच्या शरीरात होतात, परंतु ते त्यांच्या हृदयावर आणि मनावर देखील परिणाम करतात. हे बदल का होतात ते जाणून घेऊया.
लग्नानंतर महिलांचं वजन वाढतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण हे खरं आहे. महत्त्वाचं म्हणजे आनंदी वैवाहिक जीवन तुमची खाण्याची भूक वाढवतं. जरी तुम्ही या काळात हेल्दी आहार घेतला किंवा तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही हॅपी हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स तुमच्या भूकेवर परिणाम करतात.
एका अभ्यासात ८,००० हून अधिक लोकांच्या वजनाचं निरीक्षण केलं गेलं. यावेळी असं आढळून आलं की, विवाहित महिलांचं लग्नाच्या पहिल्या पाच वर्षांत किमान १०.८ किलो वजन वाढतं. ज्या महिला त्यांच्या जोडीदारासोबत राहतात परंतु विवाहित नाहीत त्यांचं वजन फक्त ८.१६ किलो वाढलं होतं. तर ज्या महिला रिलेशनशिपमध्ये असतात परंतु वेगळ्या राहतात त्यांचं वजन ६.८० किलोने वाढल्याचं पाहायला मिळालं.
लग्नानंतर मुलींमध्ये हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने त्यांच्या त्वचेत आणि केसांमध्ये देखील बदल होऊ शकतात. हार्मोनल चढउतार आणि विवाहानंतरचा ताण यामुळे मुलींच्या मासिक पाळीचं चक्रही बदलू शकतं.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.