मुंबई : पावसाळ्यात सतत खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या पोट दुखी होते. ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात अधिक मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आपल्या अतिसाराचा त्रास होऊ शकतो. यामुळे आपल्याला शरीराला हायड्रेट ठेवणे जास्त गरजेचे आहे.
हे देखील पहा -
आपले शरीर निर्जलीकरण झाले असेल तर आपल्या शरीरात खूप अशक्तपणा येतो. पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आपण अनेक पर्यांयाचा अवलंब करत असतो. आपण आजीच्या काही घरगुती उपायाचा वापर केल्यास आपल्याला या आरामातून लवकर सुटका मिळू शकते.
या उपायांमुळे अतिसारावर आराम मिळेल
१. ज्यावेळी आपल्याला अतिसाराचा त्रास होत असेल त्यावेळी आपण केळी खायला हवी. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळेल पण या त्रासातून आपल्याला आराम मिळेल.
२. पोटातून सतत आवाज येत असेल व शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो अशावेळी आपण नारळ पाणी प्यायल्याने आपल्या पोटाला आराम तर मिळेलच पण अतिसाराचा त्रासही कमी होतो.
३. तसेच या त्रासात आपली संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. कारण शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. अशावेळी आपण जिऱ्याचे पाण्यात उकळवून गाळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर थोडे थोडे प्या. यामुळे आपल्याला त्वरित आराम मिळेल.
४. यामध्ये मीठ, साखर आणि पाण्याचे (Water) द्रावण हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. आपल्याला अतिसाराचा त्रास होत असेल तर साखर (Sugar), अर्धा चमचा मीठाचे पाणी तयार करुन चांगले मिसळून प्या. यामुळे आराम मिळेल.
५. अतिसारामध्ये लिंबूपाणी खूप फायदेशीर ठरते. यासाठी पाण्यात लिंबू पिळून दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने प्या. यामुळे आपल्याला या त्रासातून आराम मिळेल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.