वीरभद्रासनाचे फायदे कोणते जाणून घ्या  Saam Tv
लाईफस्टाईल

वीरभद्रासनाचे फायदे कोणते जाणून घ्या

वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव या आसनाला दिले गेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव या आसनाला दिले गेले आहे.

हे आसन कसं करावं आणि त्याचे फायदे कोणते ते पाहुयात..

वीरभद्रासन कसे करावे? सरळ उभे रहा. दोन्ही पायांत ३-४ फूट अंतर असू द्या. उजवा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय १५ अंशांवर वळवा. दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे. हात जमिनीस समांतर आहेत का हे तपासून पहा. त्यानंतर श्वास सोडत उजव्या गुडघ्यातून वाका आणि उजवीकडे वळून पहा. या आसनात स्थिर उभे रहा. नंतर हीच कृती डाव्या बाजूसही करा. यावेळी डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस तर उजवा पाय १५ अंश वळवा.

वीरभद्रासनाचे फायदे कोणते?

- हात, पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते.

- शरीर संतुलित राहते आणि काम करण्याची क्षमता वाढते.

- खांद्यांमधला ताण कमी होतो.

- स्नायूंना बळकटी मिळाल्याने शरीराला योग्य आकार प्राप्त होतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

Mahadevi Elephant : आणू महादेवीला घरी...! हत्तीणीला परत आणण्यासाठी दोन लाखांहून अधिक कोल्हापूरकरांनी दिली स्वाक्षरी

Maharashtra Live News Update : - यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? ९९% लोकांना माहिती नसेल

Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

SCROLL FOR NEXT