Benefits of amala seeds ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आवळ्याच्या बियांचा आरोग्यासाठी होणारा फायदा

चवीला आंबट, तुरट व काही अंशी गोड असणारा आवळा आपल्या सर्वाना आवडतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आवळ्यात व त्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व आहे. आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग केसांच्या मजबूतीसाठी किंवा त्वचेवर चमक आणण्यासाठी होतो.

हे देखील पहा-

चवीला आंबट, तुरट व काही अंशी गोड असणारा आवळा आपल्या सर्वाना आवडतो. आवळा खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. आवळ्यात व्हिटॅमिन (Vitamins) बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, कॅरोटीन, लोह आणि फायबर यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. जितका फायदा आपल्याला होतो तितकाच फायदा त्याच्या बियांपासूनही होतो. आवळ्याच्या बियांचा फायदा आपल्या आरोग्यावर कसा होतो हे पाहूया.

आवळ्याच्या बियांचा आरोग्यावर होणारा फायदा -

१. आपल्याला बद्धकोष्ठता, अपचन किंवा आम्लपित्ताची समस्या असेल तर आवळ्याच्या बियांचा पावडर गुणकारी ठरू शकते. ही पावडर कोमट पाण्यात (water) टाकून पिता येईल त्यामुळे आराम मिळेल.

२. त्वचेशी संबंधित समस्यांसाठी आपण आवळ्याच्या बियांचा वापर करु शकतो. यासाठी खोबऱ्याच्या तेलात आवळ्याच्या सुक्या बिया घालून त्याची पेस्ट तयार करु शकतो. ही पेस्ट मुरुमांवर लावल्यास त्याचा फायदा होईल.

३. उन्हाळ्यात अनेकदा आपल्याला नाकातून अति उष्णतेमुळे रक्त येऊ लागते. त्यामुळे हा त्रास आणखी वाढू लागतो. अशा स्थितीत आवळ्याच्या बियापासून बनवलेल्या पावडरची पेस्ट तयार करून डोक्याला लावावी.

४. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मसालेदार अन्न (Food) किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सतत उचकी येऊ लागते. अशावेळी आवळ्याच्या बियांची पावडर मधात मिसळून खाल्ल्यास उचकीपासून लवकर आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT