AC fire safety google
लाईफस्टाईल

AC Fire Safety: ACमुळे आग अन् गुदमरून मृत्यू! बंद खोल्यांमधल्या या चुका ठरतील जीवघेण्या, वेळीच व्हा सावध

Electrical Safety: उन्हाळ्यात ACचा वापर करताना सुरक्षा महत्वाची आहे. जर त्यात काही बिघाड झाला तर आगीचा धोका वाढतो. त्यामुळे खबरदारी घेतल्या पाहिजेत.

Sakshi Sunil Jadhav

वाढत्या उन्हामुळे आपण दिवसभर घरामध्ये AC लावून बसतो. काहीजण दिवसभर कामानिमित्त बाहेर जरी असले तरी रात्रीच्या वेळेस ACचा वापर केला जातो. रात्री लावलेली AC आपण थेट दुसऱ्यादिवशी उठल्यावर बंद करतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

दिल्लीमधील विवेक विहार परिसरात भीषण आग लागली आणि ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामागचं कारण सुद्धा ACमधील बिघाड हे असण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मग यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

AC मध्ये प्लास्टिकचे भाग, वायरिंग आणि विविध इलेक्ट्रॉनिक घटक असतात. एखादा तांत्रिक बिघाड झाला किंवा ओव्हरलोडिंग झालं तर त्यातून आगीच्या ठिणग्या यायला सुरुवात होते. एकदा आग लागली तर ती काही सेकंदांतच खोलीत धूर पसरतो. कधीकधी चांगल्या कूलिंगसाठी खोली पूर्णपणे बंद ठेवतात, पण हीच गोष्ट जीवघेणी ठरू शकते.

बंद खोलीत धूर साचल्यावर ऑक्सिजनची मिळत नाही. त्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडसारख्या विषारी वायूमुळे माणसाचा दम घुटतो. झोपेत असलेल्या लोकांना याची जाणीवही होत नाही आणि काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकतो. त्यामुळे ACचा वेळेवर सर्व्हिसिंग करा. जुनी वायरिंग, ओव्हरलोडिंग याकडे लक्ष द्या.

तसेच घरामध्ये फायर अलार्म किंवा स्मोक डिटेक्टर बसवणं खूप महत्त्वाचं ठरतं. अशा उपकरणांमुळे धूर किंवा आग लागताच लगेचच इशारा मिळतो आणि वेळेत बाहेर पडण्याची संधी मिळते. तसेच फायर सेफ्टी बॉलसारखी साधनंही घरात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. बॉल स्वत: सक्रीय होऊन आग नियंत्रणात आणतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT