Heart Attack: google
लाईफस्टाईल

Heart Attack: भारतामध्ये 99% वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; वाचा मूळ कारण अन् धोके

Heart Attack Risk in India: बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात हार्ट अटॅकचा धोका झपाट्याने वाढतोय. कारणे, लपलेले धोके आणि हृदयविकार टाळण्यासाठी आवश्यक उपाय जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

भारतामध्ये हार्ट अटॅक हे मृत्यूचं प्रमुख कारण बनत चाललं आहे. देशात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्याचं कारण म्हणजे माणसाची बदलेली लाइफस्टाईल आहे. धकाधकीच्या जीवनात शरीराच्या सामान्य वाटणाऱ्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम हा हार्ट अटॅकने दिसतो. म्हणूनच आपण यावर हलक्या रोजच्या किंवा सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं टाळलं पाहिजे. पुढील बातमीत आपण हृदयविकार वाढण्याचं कारण, शरीरावर होणारा परिणाम आणि यावर काही उपाय जाणून घेणार आहोत.

हृदयविकार का वाढतोय?

सध्या लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये खूप बदल होत आहेत. व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप न झाल्याने शरीरातल्या या समस्या वाढत जात आहेत. त्यात जंक फूड आणि तेलकट पदार्थांचे सेवन वाढलेले सेवन आणि त्यामुळे शरीरात वाढणारा फॅट याला कारणीभूत आहे.

तसेच ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्याला हा धोका जास्त असतो. कारण याने धमन्यांचे नुकसान होत असतं. वाढलेले कोलेस्टेरॉल, मधुमेह, धूम्रपान या सगळ्या सवयींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

हार्ट अटॅक कसा येतो?

हार्ट अटॅक येण्यापुर्वी शरीरात अनेक बदल होतात. त्यामध्ये सगळ्यात आधी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये गाठी तयार होतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. मग हृदयाच्या स्नायूंनपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. ही समस्या जर वेळेवर बरी केली नाही तर हृदयाचं कायमचं नुकसान होतं आणि याचा शेवट मृत्यूने होतो.

धोकादायक बाब काय आहे?

हार्ट अटॅक हा अचानक येत नाही. अनेक वर्षे कोणतीही लक्षणे न देता तो शरीरात वाढत राहतो. अनेकजण स्वतःला निरोगी समजतात. मग अचानक छातीत कळा येतात. आणि हार्ट अटॅक येतो. हे धोके मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

फळे, भाज्या, संपूर्ण धान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा, धूम्रपान पूर्णपणे टाळा, तणाव कमी करा, रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करा.

वयाच्या 30 वर्षांनंतर नियमित आरोग्याची तपासणी करा. कुटुंबात कोणाला हार्टचा त्रास असेल तर जास्त सतर्क राहा. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी धोके ओळखून जीवनशैलीत बदल आणि आवश्यक उपचार केल्याने भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar Video : "कठोर निर्णयांची वेळ आली!"; नसरापूर प्रकरणावर अभिनेत्री भडकली; थेट सरकारला विनंती, वाचा नेमकं काय म्हणाली?

नसरापुरात 'त्या' दिवशी काय घडलं? नराधमाने चिमुकलीला काय खायला दिलं? पोलीस तपास धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणावरुन एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

ममतांच्या बंगालमध्ये ९२% विक्रमी मतदान, पण मुद्दे मात्र गायब; नेमकं कोणाचं पारडं जड? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

8th Pay Commission: आता पगार थेट ₹18,000 वरून ₹69,000? सरकारचा हा निर्णय ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य

SCROLL FOR NEXT