पावसाळ्यातील आरोग्य नीट राखण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स Saam Tv
लाईफस्टाईल

पावसाळ्यातील आरोग्य नीट राखण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा आला आरोग्य सांभाळा असे कायम म्हटले जाते, सातत्याने पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढते. म्हणून पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते, विशेषतः पावसाळ्यात येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात, त्याचबरोबर पचनशक्ती मंदावलेली असल्यामुळे पोट बिघडण्याचा तक्रारी वाढतात

यामुळे पावसाळ्यात प्रतिकारक शक्ती वाढविणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत .

हे देखील पहा -

सर्वप्रथम पावसाळ्यात पाणी उकळून प्या, तसेच शीतपेयांऐवजी चहा घेण्यास प्राधान्य द्या, चहामध्ये आले म्हणजेच अद्रक व गवती चहा आवर्जून टाका, दिवसभरातून साधारण दोनदा अद्रक आणि गवतीचहा टाका कायम टाकण्याची गरज नाही. कारण गवती चहा आणि आल्याच्या अतिवापराने शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात जेवणात मसाल्याच्या पदार्थांचा वापर आवर्जून टाळा, त्याऐवजी साधा आहार घेण्यावर भर द्या जसे की साधा वरणभात, खिचडी, कमी तिखटाच्या भाज्या , आमटी वगैरे

तसेच भाकरी पचायला हलकी असल्याने पोळी ऐवजी भाकरी खाण्याला या दिवसांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे.

- पावसाळ्यात भरपूर पाणी प्या, तसेच टोमॅटो सूप सह भाज्यांचे गरम सूप घ्यायला ही हरकत नाही

Edited By - Ashwini Jadhav Kedari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

NEETचं नियंत्रण थेट PMOकडे, पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचेही NTAच्या कारभारावर ताशेरे

SCROLL FOR NEXT