Chanakya Niti On Relatives  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relatives : तुमच्याकडे या गोष्टींची कमतरता असल्यास, नातेवाईकांकडे जाणे टाळा; जाणून घ्या या मागचे कारण

Relatives : आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार थोडे कठोरच असतात.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार थोडे कठोरच असतात. परंतु हा कठोरपणा जीवनाचे सत्य सांगतात. आपल्या व्यग्र जीवनात आपण या सर्व विचारांकडे दुर्लक्ष करतो, परंतु हे विचार आपल्या जीवनाच्या प्रत्येक अडचणींमध्ये कामी येतात. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी एका वाक्याचे विश्लेषण करूयात.

'एखाद्याने गरीब असताना नातेवाईकांसोबत कधीही राहू नये.' आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याजवळ पैसे (Money) कमी असल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांकडे अजिबात जाऊ नये. याचे कारण असे की जर नातेवाईकांना हे कळले तर ते तुमच्याकडे हीन नजरेने बघतील.

तुमच्याशी नीट बोलणार नाही. ते कदाचित तुम्हाला अशा दुखावलेल्या गोष्टीही बोलतील की त्या ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटेल.

अनेक वेळा लोकांना वाटतं की ते नातेवाईक (Relatives) असतील तर जायला हरकत नाही. जर तुम्हीही असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की संकटाच्या वेळी फक्त तुमचे कुटुंबच एकमेकांना साथ देऊ शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबावर विसंबून राहू शकता परंतू इतर नातेवाईक फक्त आनंदाच्या वेळी येतात.

तुम्ही निराधार आहात हे त्यांना कळले तर तुमचे फार थोडे नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील. ज्या रस्त्यावर तुमचे घर (Home) आहे त्या रस्त्यावरून बरेच लोक येणे-जाणे बंद करतील. याच कारणांमुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, गरीब असताना कधीही आपल्या नातेवाईकांसोबत राहू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT