Chanakya Niti On Friendship Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Friendship : या 3 व्यक्तींसोबत मैत्री कधीच करु नका, अन्यथा प्रगतीत येतील अनेक अडचणी

Friendship Tips : मैत्री हे नातं असं आहे की, ते नातं आपल्या हक्काचं असतं. आपल्या चांगल्या व वाईट काळात ती सतत सोबत असते.

कोमल दामुद्रे

Success Tips : आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं असतात त्यांच्याशी आपण मैत्री करतो. मैत्री हे नातं असं आहे की, ते नातं आपल्या हक्काचं असतं. आपल्या चांगल्या व वाईट काळात ती सतत सोबत असते.

परंतु, कधी कधी मैत्रीत (Friends) असे देखील चेहरे असतात जे खोटा मुखवटा घालून फिरतात. मग ते तुमच्या वाईट काळात त्यांचे खरे रंग दाखवतात. असे म्हणतात की त्यांचे पालन करणारा कधीही पराभूत होत नाही, त्याला चांगले आणि वाईट लोक ओळखण्यात कोणतीही अडचण येत नाही. आचार्य चाणक्य (Chanakya) सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने या 3 लोकांपासून अंतर ठेवले तर त्याला आनंदासोबत यशही (Success) मिळते. या 3 लोकांचा सहवास एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा बनतो, म्हणून त्यांना त्वरित सोडणे आवश्यक आहे.

1. मुर्खांची संगत -

आचार्य चाणक्य असे मानतात की मूर्ख व्यक्तीला कधीही उपदेश करू नका. याचा कधीही फायदा होत नाही. कारण ही मूर्ख व्यक्ती स्वत:ला श्रेष्ठ समजतो. अशी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचे ऐकत देखील नाही. अशा लोकांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान देणे म्हणजे तुमचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे. अशा लोकांपासून अंतर राखणे चांगले आहे कारण ते फक्त वेळ वाया घालवत नाहीत तर तुमच्या यशात अडथळे देखील बनतात.

2. प्रत्येक क्षणाला त्रास देणाऱ्या स्त्रिया

आचार्य चाणक्यांनी अशा महिलांनाही चुकीचे मानले आहे ज्या केवळ स्वतःचे म्हणणे खरे करतात. कोणत्याही व्यक्तीचे ते ऐकत नाही. चाणक्य म्हणतात की, दुष्ट स्वभावाच्या पत्नीसोबत राहणे, जिच्या शब्दात कटुता, खोटे बोलणे आणि फसवणूक करणे हे नरकात राहण्यासारखे आहे. अशा महिला घरात राहिल्याने भावी पिढीवर वाईट परिणाम होतो. अशा स्त्रिया स्वतःचे तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्यांचेही नुकसान करतात.

3. सतत रडरड करणारी व्यक्ती

चाणक्य म्हणतात की दुःखात एखाद्याला त्रास देणे चांगली गोष्ट आहे परंतु, अशा लोकांना समजावून काही फायदा नाही. अशी माणस दु:खातून कधीच बाहेर येत नाही. कारण जोपर्यंत ते स्वतःहून बाहेर पडू इच्छित नाहीत. अशा लोकांच्या मागे तुमचे कष्ट तुमची मेहनत वाया जाऊ शकते. तसेच अशा लोकांसोबत राहिल्याने व्यक्ती स्वतः नकारात्मक विचार करू लागते आणि वाईट गोष्टी त्याच्या मनावर वर्चस्व गाजवू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT