Celebration of 75th Independence Day, Bharat ratna award  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Celebration of 75th Independence Day : आजपर्यंत फक्त ५ महिलांना मिळाला आहे भारतरत्न, जाणून घ्या!

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. मात्र आतापर्यंत ४८ सेलिब्रिटींपैकी केवळ ५ महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

Celebration of 75th Independence Day : भारतरत्न हा देशातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. हा पुरस्कार देशाच्या प्रती सर्वोच्च काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

हे देखील पहा -

भारताची कीर्ती जगभरात पसरवणाऱ्या व्यक्तीस सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. अनेकांना हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. १९५४ पासून आतापर्यंत एकूण ४८ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये बहुतांश पुरुषांचा समावेश आहे. हा पुरस्कार आतापर्यंत फक्त पाच महिलांना (Women) देण्यात आला असून हा सन्मान जितका प्रतिष्ठेचा आहे, तितकाच वादाचे कारण म्हणून ओळखाला जातो. वर्षानुवर्षे भारत सरकार या पुरस्काराची घोषणा करत असल्याने बहुतांश राजकारण्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार भारतातील खूप कमी महिलांना मिळाला आहे. कोणत्या महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे हे जाणून घेऊया.

भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी २ जानेवारी १९५४ रोजी या पुरस्काराची स्थापना केली होती. यापूर्वी हा सन्मान मरणोत्तर दिला जात नव्हता, मात्र १९५५ पासून हा सन्मान मरणोत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अनेक राजकारण्यांनाही हा सन्मान मिळाला आहे. मात्र, १३ जुलै १९७७ ते २६ जानेवारी १९८० पर्यंत हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला.

१. इंदिरा गांधी यांना १९७२ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या वर्षी, पाकिस्तान-बांगलादेश युद्धातील भूमिकेबद्दल राष्ट्रपती व्हीव्ही गिरी यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

२. मदर तेरेसा यांना १९८० मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मदर तेरेसा त्यांच्या कार्यासाठी जगभरात ओळखल्या जातात. मदर तेरेसा रोमन कॅथलिक असल्या तरी त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व होते. गरीब आणि असहाय्य लोकांना दीर्घकाळ मदत केल्याबद्दल मदर तेरेसा यांना भारतरत्न देण्यात आला.

३. १९४२ साली भारत (India) छोडो आंदोलनात इंग्रजांनी महत्त्वाचे योगदान दिले. यादरम्यान त्यांनी मुंबईतील गोवालिया मैदानावर ध्वजारोहण केले, ज्याची आजही आठवण केली जाते. १९९७ मध्ये अरुणा आसफ आली यांना त्यांच्या योगदानासाठी भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९८ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढण्यात आले.

४. मदुराई षण्मुखवादिवु सुब्बुलक्ष्मी या भारतरत्न प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला कलाकार होत्या. युनायटेड नेशन्स असेंब्लीमध्ये संगीत सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. सुब्बुलक्ष्मी यांना १९९८ मध्ये संगीत विश्वातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

५. संगीत क्षेत्रात ग्रानसमाज्ञी लता मंगेशकर यांची तुलना कुणीही करु शकत नाही. आजही त्यांनी गायलेली गाणी तरुण पिढीच्या ओठांवर गुणगुणत असतात. २००१ मध्ये त्यांना संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे सन्मानित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-दिल्लीमध्ये मोठ्या घातपाताचा कट उधळला; दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

CNG Price Hike: महागाईचा भडका! सीएनजीचे दर २.५० रुपयांनी वाढले; प्रति किलोसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा दलालांकडून लूट, व्हिडिओ व्हायरल

Nanded Crime : नांदेड हादरले! शिवसेना कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या, ४८ तासातली पाचवी घटना

Eyebrow Shape Tips: आयब्रो करताना या चूकीमुळे बिघडेल तुमचा लूक; चेहऱ्याला परफेक्ट बसणारा शेप कसा निवडाल?

SCROLL FOR NEXT