स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना संगित आणि साहित्यात विशेष आवड होती.
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांना वेद, पुराण, बायबल, कुराण, धम्मपद, तनाख, गुरु ग्रंथ साहिब, दास कॅपिटल, भांडवलशाही, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य, संगीत आणि तत्वज्ञान या सर्व विषयांचे ज्ञान होते.
स्वामी विवेकानंद 1893 मध्ये शिकागो (अमेरिका) येथील जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
त्यावेळी युरोप-अमेरिकेतील लोक भारतीयांकडे पुढे येण्यासाठी संधी देत नव्हते. तेव्हा एका अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नामुळे स्वामी विवेकानंद यांना बोलण्यासाठी थोडा वेळ मिळाला.
त्यावेळी त्यांनी जागतिक धर्म परिषदेतील 'धर्म संसदे'मधील भाषणाची सुरुवात 'बंधू आणि भगिनी' असे म्हणत केली.
विवेकानंदांनी मूर्तीपूजेला महत्त्व दिले नाही, पण विरोधही केला नाही. त्यांच्या मते 'देव' ईश्वर हा सर्व घटकांमध्ये आहे.
जग ही ईश्वराची निर्मिती आहे. शरीर जिवंत असताना 'आत्मा'ची काळजी घेणे हे आत्म्याचे कर्तव्य आहे, असे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.