22 एप्रिल दरम्यान घडलेला पहलगामचा हल्ला आजही आठवला की डोळ्यात अश्रू येतात. फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आता शांत झालंय.
पहलगाम हे फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर आणि हिरवाईने नटलेलं ठिकाण आहे. तिथे हिरवीगार लांबसडक मैदाने, मोठ-मोठ्या डोंगररांगा आणि झाडं पाहून सगळा थकवा, ताण नाहीसा होतो असं म्हणतात. पहलगाममधलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बैसरन.
तिथेच मागच्या वर्षी २२ एप्रिल २०२५ मध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांना मारलं गेलं. त्यात कोणाचे वडील तर कोणाची मुलं होती. आता हेच सुंदर ठिकाण पर्यटकांच्या लिस्टमधून वेगळं जातंय असं चित्र समोर आलं आहे. सुरुवातीला इथे पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली होती. पण वर्षभरानंतर ही परिस्थिती सुधारेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती.
दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरन घाटी आणि जवळच्या परिसरात पूर्णपणे पर्यटनासाठी खुला करण्यात आलेला नाही. पण तिथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जर हीच परिस्थिती सुरु राहिली, तर अनेकांना उपाशीच राहावं लागेल. तिथे व्यवसाय होत नाहीये. जे काही पर्यटक येतात ते फक्त १ ते २ दिवसांसाठीच येत असतात. यांच्या संख्येत ३० टक्के घट झाली आहे. तर सरकारकडून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या सुरक्षा आणि बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.