अजय देवगन आणि काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी जवळपास ४ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर लग्न केले.
अजय आणि काजोलची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. सुरुवातीला भांडणापासून सुरुवात झालेल्या या लव्हस्टोरीचे रुपांतर लग्नापर्यंत झाले.
१९९५ रोजी हलचल या चित्रपटाच्या सेटवर काजोल आणि अजय देवगनची भेट झाली. यावेळी त्या दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले नव्हते.
काजोल ही खूप चचंल होती. तर अजय खूपच शांत मुलगा होता. त्यामुळे काजोल आणि अजयचे सुरुवातीला पटले नाही. त्यांना एकमेकांना भेटण्याचीही इच्छा नव्हती.
या चित्रपटानंतर ते दोघे एकमेकांना २ वर्षे भेटलेदेखील नाही. त्यावेळी ते दोघे वेगवेगळ्या लोकांना डेट करत होते.
गुंडराज चित्रपटामुळे ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांनी एकमेकांना डेट केले.त्यावेळी काजोलने जुन्या रिलेशनशिपबद्दल अजयजवळ मनमोकळ केलं होतं.
यानंतर त्यांची मैत्री आणि मग प्रेम झालं. काजोलने २४ व्या वर्षी लग्न करु नये, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोल आणि अजय देवगनने लग्नगाठ बांधली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.