Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Birthday: शाहरुखने संपूर्ण जग पालथं घातलं, पण काश्मीरला गेला नाही; काय आहे कारण?

Shah Rukh Khan: संपूर्ण जग फिरणारा शाहरूख काश्मिरला का गेला नाही. काय आहे यामागचं नेमकं कारण ते जाणून घेऊया.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आज त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त त्याला संपूर्ण जगभरातील चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहरूख खानची सिनेसृष्टीवर अनोखी छाप आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये त्याने आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत. भारत तसेच भारताबाहेर त्याने चित्रपटांचे शुटिंग केले आहे. अशातच तुम्हाला हे माहित आहे का? संपूर्ण जग फिरणारा शाहरूख काश्मिरला का गेला नाही. काय आहे यामागचं नेमकं कारण ते जाणून घेऊया.

शाहरूख खानने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझ्या वडिलांची आई ही काश्मिरी होती. म्हणून एकदा वडिलांनी मला सांगितले की, आयुष्यात एकदा तरी इस्तंबूल, रोम आणि काश्मीर या तीन ठिकाणांना भेट दिली पाहिजे. असं शाहरूखचे बाबा त्याला म्हणाले होते.

पुढे शाहरूख म्हणाला, "माझे बाब खुप लवकर हे जग सोडून गेले." मी कामानिमित्त सर्वत्र फिरत असतो. पण मी कधीच काश्मीरला गेलो नाही. मला अनेक संधी आल्या पण मी कधी काश्मीरला जात नाही माझे वडीलांनी मला सांगितले होते, 'काश्मीर मेरे बिन मत देखना... मै दिखाऊंगा...'

याचदरम्यान अनेकदा कामानिमित्त शाहरूख खान काश्मीरला गेला असल्याचे बोलले जात आहे. परंतु काश्मीरला चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेला असला तरी काश्मीरला फिरायला कधीही गेला नसल्याचे म्हणतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT