Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: "यामुळे मी घराबाहेर पडलो..."; बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर वैभवने कोणावर साधला निशाणा

Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Interview: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वैभवने बिग बॉसच्या घरातील त्याच्या खेळीवर भाष्य केले आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ ची सध्या जबरदस्त चर्चा आहे. या शोमधील एक एक स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहेत. अलिकडेच आर्या आणि वैभव घराबाहेर पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वैभवने मुलाखत दिली आहे.

बिग बॉसच्या घरात वैभव टीम ए मध्ये होता. या टीममध्ये त्यांच्यासोबत निक्की, वैभव, अरबाज, धनंजय, वर्षा ताई आणि सूरज हे स्पर्धक होते. नुकतंच सकाळ प्रिमियर चॅनलशी वैभवने संवाद साधला. यावेळी वैभवने बिग बॉसच्या घरातील खेळीवर भाष्य केले आहे. मुलाखतीत त्याला, वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरात मैत्रीसाठी, खेळ खेळण्यासाठी की ट्रॉफीसाठी गेला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर वैभव म्हणाला, "मी नक्कीच ट्रॉफीसाठी गेलो होतो. मात्र काही गोष्टी अशा घडल्या की, त्या माझ्या हातात नव्हत्या. त्या गोष्टी मी नीट करू देखील शकत होतो.

पण मला असं वाटतं की त्यामध्ये मी जास्तच अडकून गेलो होतो. मला देखील कळत होतं की मी कुठेतरी चुकतंय शेवटी..." या बद्दल मी बिग बॉसच्या घरात देखील माफी मागितली आणि प्रेक्षकांची देखील माफी मागतो की माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या असतील तर.." टीम ए मध्ये वेभवने शेवटपर्यत मैत्री जपण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला असे त्याने म्हटले. वैभवने, "तुम्ही दिलेले सल्ले मी फॉलो करायला हवे होते. पण मिळालेल्या संधीचं सोनं मला करता आलं नाही याचा मला दु:ख आहे" असंही वैभव म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT