Suniel Shetty Saam tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty: अकबर-बाबरपेक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट का नाहीत? सुनील शेट्टीचा कडक सवाल

Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीने विचारले की अकबर आणि बाबर सारख्या ऐतिहासिक व्यक्तींवर चित्रपट का बनवले जातात. त्याऐवजी राजपूत आणि शिवाजी महाराजांवर चित्रपट का नाही बनवत.

Shruti Vilas Kadam

Suniel Shetty: २०२५ मध्ये आलेल्या 'केसरी वीर' या चित्रपटात सुनील शेट्टीने काम केले होते. जो गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या विध्वंसांवर आधारित होता. पण, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनील यांनी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी का करू शकला नाही हे स्पष्ट केले आणि अकबर आणि बाबर सारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांबद्दलही त्यांचे मत व्यक्त केले.

'केसरी वीर' चित्रपटात काम करण्यापूर्वी सोमनाथ मंदिराच्या इतिहासावरील त्यांच्या संशोधनाबद्दल बोलताना त्यांनी 'लेहरेन रेट्रो' ला सांगितले, "आम्ही चित्रपट बनवण्यापूर्वी बरेच संशोधन केले होते, परंतु दुर्दैवाने, तो चित्रपट चांगला चालला नाही. वितरण हा एक मोठा खेळ आहे; आम्हाला थिएटर मिळाले नाहीत. निर्मात्यालाही मोठे नुकसान सहन करावे लागले कारण एक चांगला चित्रपट वाया गेला."

इतिहासावर सुनील शेट्टी यांचे सडेतोड उत्तर

पुढे सुनील शेट्टी म्हणाला, "आपण फक्त औरंगजेब, अकबर, बाबर आणि बिरबल यांच्याबद्दलच का बोलतो? आपला इतिहास आपल्या संस्कृतीबद्दल असला पाहिजे. तो वेद, राजपूत राजे, शिवाजी महाराज आणि इतर सर्वजण, प्रत्येक राज्यातील प्रत्येक नायकाबद्दल असला पाहिजे. माझ्या मते राजपूत राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची चर्चा तितकी होत नाही जितकी व्हायला हवी होती.

सुनील शेट्टीचे आगामी चित्रपट

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सुनील शेट्टीने अलीकडेच 'बॉर्डर २' मध्ये कॅमिओ केला आहे. यामध्ये त्याचा मुलगा अहान शेट्टी सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन यांच्यासोबत दिसला होता. त्याचा 'वेलकम टू द जंगल' हा मल्टीस्टारर चित्रपट देखील येत आहे आणि तो "हेरा फेरी ३" चा देखील भाग आहे.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT