राज्यात 100% क्षमतेने थिएटर्स सुरु करा; अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र Saam Tv
मनोरंजन बातम्या

राज्यात 100% क्षमतेने थिएटर्स सुरु करा; अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

22 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु होणाऱ्या नियमावलीत बदल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पात्र लिहून केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची पकड सैल होऊ लागल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून, हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 22 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु होणाऱ्या नियमावलीत बदल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पात्र लिहून केली आहे.

राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे Dr Amol Kolhe यांनी राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50 टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी राज्य सरकारने मंगळवारी दिली. मात्र राज्य सरकारने या निर्णयात विचार करून 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरू करावेत. कारण कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशी मागणी करणारे पत्र मुखमंत्री यांना केले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT