Allu arjun and telangana CM Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Case : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीनी केला पुष्पाराजवर आरोप: म्हणाले पोलिसांची परवानगी नसताना...

Allu Arjun Case : अल्लू अर्जूलवर पोलिसांनी नकार दिल्यानंतरही 'पुष्पा-२' चित्रपटाच्या प्रदर्शनाला उपस्थित राहिल्याचा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Allu Arjun Case : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनवर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शनिवारी आरोप केला. ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला पुष्पा-२ चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली तरीही अल्लू अर्जुन तिथे उपस्थित राहिला. रेड्डी यांनी दावा केला की कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही, पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यास भाग पाडले तोपर्यंत अल्लू अर्जुन सिनेमागृहाबाहेर पडला नाही.

एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रेड्डी यांचे हे वक्तव्य समोर आले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंचा संदर्भ देत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनवर रोड शो केल्याबद्दल आणि मोठ्या संख्येने गर्दी असूनही हात हलवून शुभेच्छा दिल्याबद्दल टीका केली, ज्यामुळे त्याभागात गोंधळ उडाला.

रेड्डी पुढे म्हणाले, थिएटरच्या व्यवस्थापनाने २ डिसेंबर रोजी पोलिसांना ४ डिसेंबर रोजी वरिष्ठ कलाकार आणि इतरांच्या भेटीसाठी सुरक्षा मागितली होती. परंतु, गर्दी व्यवस्थापित करण्याच्या चिंतेमुळे पोलिसांनी ही विनंती नाकारली.थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणि बाहेर पडताना, अभिनेता त्याच्या कारच्या सनरूफवरून गर्दीला हात हलवत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे हजारो चाहते जमले आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी धडपड करत होते, असे रेड्डी यांनी नमूद केले.

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर, त्याच्या निवासस्थानी गेलेल्या चित्रपट कलाकारांवरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला, परंतु या घटनेत जखमी झालेल्या तरुण मुलाबद्दल कोणत्याही कलाकाराने सहानुभूती दाखवली नाही. चेंगराचेंगरीसारख्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही विशेष सुविधा मिळणार नाहीत यावर त्यांनी भर दिला आणि सामान्य लोकांना त्रास देणाऱ्यांना सरकार सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले.

अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी पुष्पा-२ च्या प्रीमियरसाठी हजारो चाहते जमले असताना हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती आणि त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि १४ डिसेंबर रोजी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT